शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळ्याचा ऐतिहासिक तलाव नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:45 IST

दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देतलावाची दुर्दशाकमी पर्जन्यमानाने तलाव पडला कोरडातलावात पाण्याऐवजी काटेरी झुडपाचे साम्राज्यदुरुस्ती, गाळ काढण्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्षग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावाशेती, मासेमारी, पशुपालन व्यवसाय संकटात

चंद्रमणी इंगळेहरताळे, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव : दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही अपयश येत असल्याची स्थानिकांची व्यथा आहे. परिणामी तलावावर उपजीविका करण्यात येणारा शेती, मासेमारी व पशुपालन व्यवसायही संकटात आला आहे.सलग पाच वर्षांपासून तलावात ठणठणाट असल्याने संपूर्ण तलावात इंग्रजी बाभळीचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याऐवजी संपूर्ण तलावात काटेरी झुडपांमुळे जंगल तयार झाले आहे. तलावाने संपूर्ण क्षेत्रात बकाल स्वरूप धारण केले आहे. दुरुस्तीऐवजी तलावाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. शासनाने भविष्याचा विचार करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आताच काटेरी झुडपे काढून दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.हरताळे तलावालगत पुरातन असे श्रावणबाळ समाधी मंदिर आहे.गत वेळेस प्रशासनाच्या लक्षात आणूनदेखील कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी संबधित विभागाला तलावाच्या दुरवस्थेसंदर्भात सांगण्यात आले आहे. दुरुस्तीसंदर्भात आतापासूनच पावले उचण्याची गरज आहे.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी भरावही टाकून पिंचिंग करणे, विस्तारीकरण व खड्डे बुजवून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. भरावाला पडणाऱ्या खड्ड्यामुळे धोका निर्माण झाला आहे.शेकडो वर्षांच्या पुरातन तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळेच तलाव कोरडा पडण्याची वेळ आली आहे. इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत तलावाचे सौदर्य खुलविण्यासाठी केवळ गप्पागोष्टी ऐकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पूर्ततेची अजूनही वाटच पहावी लागत आहे. नवसांजवणीचेही स्वप्न भंगले आहे. सलग पाच वर्षांपासून तलावात ठणठणाट असल्याने गावातील सर्वसामान्य माणसालादेखील तलावाबाबत उदासीनतेमुळे खेद व्यक्त होत आहे.गावाकडील भागाचे काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गावाकडील भागात किमान पावसाचे पाणी साठवणसाठी काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तलावाची दुर्दशा कायम असल्याने त्यावर विसंबून शेती व्यवसाय, मासेमारी व्यवसाय पशुधन विकास बंद पडले असून रोजगार निर्मिती नष्ट झाली आहे.शासन एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु येथे शाश्वत असलेल्या नैसर्गिक तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांकडून काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मागणी केली आहे. मासेमारी सोसायटीचे चेअरमन एस. ए. भोई यांनी तलाव कोरडा पडण्याची चिंता करीत पारंपरिक मासमारी व्यवसाय नष्ट झाल्याने खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेला निवेदन देणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर