शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळ्याचा ऐतिहासिक तलाव नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:45 IST

दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देतलावाची दुर्दशाकमी पर्जन्यमानाने तलाव पडला कोरडातलावात पाण्याऐवजी काटेरी झुडपाचे साम्राज्यदुरुस्ती, गाळ काढण्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्षग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावाशेती, मासेमारी, पशुपालन व्यवसाय संकटात

चंद्रमणी इंगळेहरताळे, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव : दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही अपयश येत असल्याची स्थानिकांची व्यथा आहे. परिणामी तलावावर उपजीविका करण्यात येणारा शेती, मासेमारी व पशुपालन व्यवसायही संकटात आला आहे.सलग पाच वर्षांपासून तलावात ठणठणाट असल्याने संपूर्ण तलावात इंग्रजी बाभळीचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याऐवजी संपूर्ण तलावात काटेरी झुडपांमुळे जंगल तयार झाले आहे. तलावाने संपूर्ण क्षेत्रात बकाल स्वरूप धारण केले आहे. दुरुस्तीऐवजी तलावाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. शासनाने भविष्याचा विचार करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आताच काटेरी झुडपे काढून दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.हरताळे तलावालगत पुरातन असे श्रावणबाळ समाधी मंदिर आहे.गत वेळेस प्रशासनाच्या लक्षात आणूनदेखील कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी संबधित विभागाला तलावाच्या दुरवस्थेसंदर्भात सांगण्यात आले आहे. दुरुस्तीसंदर्भात आतापासूनच पावले उचण्याची गरज आहे.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी भरावही टाकून पिंचिंग करणे, विस्तारीकरण व खड्डे बुजवून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. भरावाला पडणाऱ्या खड्ड्यामुळे धोका निर्माण झाला आहे.शेकडो वर्षांच्या पुरातन तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळेच तलाव कोरडा पडण्याची वेळ आली आहे. इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत तलावाचे सौदर्य खुलविण्यासाठी केवळ गप्पागोष्टी ऐकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पूर्ततेची अजूनही वाटच पहावी लागत आहे. नवसांजवणीचेही स्वप्न भंगले आहे. सलग पाच वर्षांपासून तलावात ठणठणाट असल्याने गावातील सर्वसामान्य माणसालादेखील तलावाबाबत उदासीनतेमुळे खेद व्यक्त होत आहे.गावाकडील भागाचे काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गावाकडील भागात किमान पावसाचे पाणी साठवणसाठी काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तलावाची दुर्दशा कायम असल्याने त्यावर विसंबून शेती व्यवसाय, मासेमारी व्यवसाय पशुधन विकास बंद पडले असून रोजगार निर्मिती नष्ट झाली आहे.शासन एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु येथे शाश्वत असलेल्या नैसर्गिक तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांकडून काटेरी झुडपे उपटून दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मागणी केली आहे. मासेमारी सोसायटीचे चेअरमन एस. ए. भोई यांनी तलाव कोरडा पडण्याची चिंता करीत पारंपरिक मासमारी व्यवसाय नष्ट झाल्याने खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेला निवेदन देणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर