शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

घर उद्ध्वस्त करून ते पुन्हा बांधायचे हाच त्यांचा कार्यक्रमच -पालकमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:14 IST

केळी फळपीक विमा योजनेतील संरक्षित विम्याच्या लाभासाठी नवीन निकष केंद्र सरकारनेच लागू केले होते.

ठळक मुद्देकेळी पीक विमा योजनेचे निकष केंद्र सरकारनेच लागू करून पुन्हा बदलण्याचे राज्य सरकारला आदेश देण्याचे फार मोठे कौतुक नाहीपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डागली तोफ

रावेर : केळी फळपीक विमा योजनेतील संरक्षित विम्याच्या लाभासाठी नवीन निकष केंद्र सरकारनेच लागू केले होते. ते निकष केळी उत्पादक शेतकरी हिताचे नसल्याने पूर्ववत निकष लागू करण्यासाठी चार कॅबिनेट मंत्र्यांची समिती नियुक्त करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून तो निर्णय होणारच होता. मात्र केंद्र सरकारने लागू केलेले निकष बदलण्यासाठी राज्य सरकारला आदेश पारीत करण्याचे फार एवढे मोठे कौतुक नाही. घर उद्ध्वस्त करून घर बांधायचे हाच यांचा कार्यक्रम आहे, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.यंदा हवामानावर आधारित सुधारीत व त्रैवार्षिक केळी फळपीक विमा योजना लागू करताना थंडीतील किमान ८ सेल्सिअंश पेक्षा कमी तापमानाची कालमर्यादा तीन दिवसांऐवजी पंधरा दिवसांवर करून संरक्षित विम्याची रक्कम ३३ हजारांवरून ९ हजारांवर तर कमाल तापमान ४० सेल्सिअंशाऐवजी ४२ ते ४५ सेल्सिअंश तापमानापेक्षा जास्त सतत तीन ते पाच दिवसांऐवजी तब्बल १५ दिवसांवर कालमर्यादा घालून संरक्षित विम्याचे रक्कम ३३ हजारांऐवजी नऊ हजारांवर आणून तर वेगवान वाऱ्याच्या नुकसानीत ६५ हजारांऐवजी ५० हजारांवर आणून शेतकरी हिताला बाधा निर्माण करणारे निकष लागू केले आहेत.हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०११ मध्ये अंमलात आल्यापासून गत १० वर्षात सन २०१९ मध्ये त्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना खºया अर्थाने न्याय देणारी अशी परिपूर्ण योजना राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करताना केंद्र सरकारने आंबा, द्राक्ष, चिकू, डाळींब, संत्री, मोसंबी आदी फळपिकांच्या कुठल्याही निकषात बदल न करता केवळ केळी फळपीक विमा योजनेच्या निकषातच फेरबदल करून केळी उत्पादकांच्या नाकाला चुना लावला गेला.ही केळी फळपीक विमा यंदा लागू होताच पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केळी उत्पादकांची कैफियत मांडली होती. खासदार रक्षा खडसे यांनीही तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे केळी फळपीक विमा योजनेचे निकष पूर्ववत लागू करण्याची मागणी केली होती.दरम्यान, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमरसिंह यांची भेट घेऊन केळी फळपीक विमा योजनेच्या निकषात फेरबदल करण्याची मागणी करत, राज्य शासनाला केंद्र सरकारकडून आदेश पारीत करणार असल्याचे आश्वासन पदरात पाडून घेतले.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी स्पष्ट केले की, केळी फळपीक विमा योजनेचे निकष त्यांनीच लागू केलेत. तेच निकष बदलण्यासाठी ते राज्य सरकारला आदेश देत असले तरी राज्य सरकार तत्पूर्वीच ते निकष बदलण्यासाठी चार कॅबिनेट मंत्र्यांची समिती गडित करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी अनुकूल असताना राज्य सरकारला आदेश काढले म्हणजे फारच मोठे कौतुक नसल्याचा हल्ला चढवला आहे. किंबहुना घर उद्ध्वस्त करून घर बांधायचे हाच यांचा कार्यक्रम असल्याची तोफ त्यांनी गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे डागली. किंबहुना, तुम्हाला तुमची पॉवर दाखवायचीच असेल तर केळीला फळाचा दर्जा देवून केंद्र सरकारशी निगडित असलेल्या अंगणवाडीत प्रत्येक बालकाला दररोज किमान दोन केळी शासन निर्धारित मूल्य निश्चित करून पोषण आहारात पुरवण्याचे आदेश पारीत केल्यास केळीचे वर्षाकाठी किमान सव्वा लाख ट्रक केळीचा खप होऊन केळी भाव स्थिरावून केळी उत्पादकाला जगण्यासाठी मदत होणार असल्याने ती तरी बोंब पाडावी, असे आव्हानही त्यांनी दिले.हे तर सामान्य व्यवहारज्ञानदरवर्षी घर, शेती, इमारत, रस्ते तथा जिल्हा नियंत्रण दरात वाढ होत असताना केळी फळपिकाचे मूल वा त्याच्या नुकसान भरपाईत तरी घट कशी होईल? यासंदर्भात एखाद्या गुलाबराव पाटील यांच्यासारख्या शेतकºयाने जरी आव्हान उभे ठाकले तरी त्याला न्याय मिळणारच आहे. ही व्यवहार ज्ञानाची बाब असताना केंद्र सरकारने लागू केलेले निकष बदलावे लागणारच आहेत, अशी पुष्टीही गुलाबराव पाटील यांनी जोडली आहे.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर