शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:45 IST

३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती

जळगाव : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्याला यावर्षी भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जळगाव जिल्ह्यातील ६६ पाणलोट क्षेत्रांमध्ये जानेवारी महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरने खालावली आहे. विशेष म्हणजे केळी लागवड होणाºया जळगाव, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वात जास्त घटली असल्याचे विदारक चित्र आहे. १० क्षेत्र अतिशोषित भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद या सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी जानेवारी महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरपर्यंत खालावली असल्याचे समोर आले आहे. त्यात ६६ पाणलोट क्षेत्रांपैकी १२ क्षेत्र हे अंशत: शोषित, २ क्षेत्र शोषित, १० क्षेत्र अतिशोषित आहेत. उर्वरित क्षेत्र हे अद्याप धोकादायक नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सातत्याने घटत असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून डार्कझोन जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये नव्याने कूपनलिका करणे, विंधन विहिरी खोदणे यावर बंदी घातली आहे. यावल तालुक्यात मोठी घट काही तालुक्यांमध्ये भूजल पातळी अर्धा मीटरने तर काही तालुक्यांमध्ये तब्बल साडेतीन ते चार मीटरने घटली आहे. सर्वात जास्त भूजल पातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये यावल (३.९७ मीटर), रावेर (३.९४ मीटर), जळगाव (२.८१ मीटर), बोदवड (२.८० मीटर), मुक्ताईनगर (२.०४ मीटर) या तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये भूजल पातळी अद्याप फारशी घटली नसली तरी प्राथमिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचार करायला भाग पाडणारी आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाआधारे केंद्रीय भूजल मंडळाने २०११ मध्ये जाहीर केलेल्या भूजल मूल्यांकनानुसार जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यात आता पुन्हा जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने अधिक भर पडली आहे. मागील वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याची भूजल पातळी अजून घटली आहे. सातत्याने घटत जाणारी भूजल पातळी ही धोक्याची घंटा असून जलसंधारणाच्या बाजूने विचार करायला लावणारी असल्याचे मत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शासनाने या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र निहाय तसेच तालुका निहाय भूजल पातळी मोजली जाते. यामध्ये जवळपास ३ ते ४ मीटरपर्यंत भूजल पातळी खालावली आहे. यात यावल, रावेर या भागात ही पातळी जास्त खालावली आहे. अजूनही सर्वेक्षण सुरू असून २५ मेपर्यंत आकडेवारी स्पष्ट होईल. - विजय जवंजाळ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

टॅग्स :Jalgaonजळगाव