शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भाडेवाढीमुळे जळगावच्या केळीला दिल्ली आता दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:54 IST

रेल्वे भाडय़ात मिळणारी सवलत बंद झाल्याने दिल्ली सारख्या प्रचंड मोठी अशी हक्काची बाजारपेठ गमावण्याची वेळ, उत्पादकांवर आली असून केळीची दयनिय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेद्वारे होणा:या केळीच्या वाहतुकीऐवजी रस्तामार्गाने होणा:या वाहतुकीला चालना रायपनिंग व कोल्ड स्टोअरेजमुळे केळी पिकवणे व टिकवून ठेवण्यास या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होत आहे अपार मेहनत करून पिकवलेल्या केळीला बाजारपेठेअभावी दयनीय स्थितीचा सामना करावा लागत आहे.

ऑनलाईन लोकमत के:हाळे जि. जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी नवीन कृषीतंत्रज्ञान आत्मसात करीत केळीचा दर्जा आणि उत्पादनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहे. बदलती बाजारपेठ व ग्राहकांच्या पसंतीस अनुकूल उत्पादन घेण्याचे कसबही शेतकरी दाखवत आहे. परंतु शेतक:यांच्या या मेहनतीवर रेल्वे भाडेवाढीमुळे पाणी फेरले गेले आहे, परिणामी जिल्ह्यातील केळीला आता दिल्ली दूर वाटू लागली आहे. अपार मेहनत करून पिकवलेल्या केळीला बाजारपेठेअभावी दयनीय स्थितीचा सामना करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 40 ते 50 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होते, यापैकी सर्वाधिक सुमारे 20 हजार हेक्टरवर केवळ रावेर तालुक्यात लागवड केली जाते. यानंतर यावल, चोपडा, मुक्ताईनगर व इतर तालुक्यात लागवड होते. रावेर तालुक्यातील शेतक:याची केळीशी पुर्वापार नाळ जुळली आहे. केळीचे भरपूर उत्पादन घेण्यात पारंगत असलेला या भागातील शेतकरी नफा- तोटय़ाचा विचार न करता सदैव केळी पिकालाच प्राधान्य देत आलेला आहे. नवनवीन प्रयोग करीत जास्तीत-जास्त उत्पन्न घेण्याचा त्याचा आजर्पयत प्रयत्न राहिला आहे. या भागातील शेतकरी पारंपरिक केळी उत्पादन घेण्यात अव्वलस्थानी होता. तो आजही आहे. आता ठिबक सिंचन प्रणाली आली आहे. तसेच उतिसंवर्धित (टिश्युकल्चर) बियाणेदेखील शेतक:यांना उपलब्ध आहेत. यामुळे केळीचे उत्पादन व दर्जा वाढला. तसेच खर्च सुद्धा वाढला. परंतु ज्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी हातभार लावला त्या संस्था तथा शासन स्तरावर केळी मालासाठी विश्वासार्ह व सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या प्रकारामुळे उत्पादन होवून सुद्धा केळीतून अपेक्षीत पैसे हातात पडत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दरम्यान, टिश्यूकल्चर केळी रोपांची लागवड करण्यासाठी लागणारे अर्थसाह्य आजही अल्प आहे. अशा रोपांची लागवड करण्याची इच्छा असली तरी मात्र ते करू शकत नसल्याची स्थिती आहे. यामुळे लहान शेतकरी रोपांच्या खालील दुय्यम दर्जाची बिजवाई (बेणे) लागवड करण्यातच समाधान मानत आहेत. केळी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर टिश्युकल्चर रोपांची विक्री कमी दरात केली जावी असा एक मतप्रवाह असून याबाबत विचार होणे गरजेचे आहे. दरम्यान, रायपनिंग व कोल्ड स्टोअरेजमुळे केळी पिकवणे व टिकवून ठेवण्यास या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होत आहे, त्यामुळे कच्चा माल वाहतुकीचे मार्गदेखील मोकळे झाले आहेत. घरपोचमुळे व भाडेवाढीमुळे राजधानी दुरावली.. एकेकाळी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दिल्ली शहरात आज रोजी केळी बाजारात सामसूम आढळून येत आहे. पूर्वी दररोज किंवा दिवसाआड भरली जाणारी रेल्वे व्ॉगन इतिहास जमा झाली आहे. रेल्वेद्वारे दिल्लीला गेलेली केळी त्यानंतर देशाच्या पूर्व भागातील व शेजारील व्यापारी इतर व्यापा:यांकरवी संबंधित ठिकाणी विक्री करायचे. परंतु हाताळणीमुळे मालाचा दर्जा खालावून विक्रीवर परिणाम व्हायचा. यावर उपाय म्हणून रेल्वेद्वारे वातानुकुलीत व्ॉगन्स् उपलब्ध करून देण्यात आल्या. यात 22 रॅक असायचे. मात्र रेल्वे भाडय़ात अनुदान नसल्यामुळे हे रॅक भरणे शेतक:यांना परवडणारे नसायचे म्हणून तो रॅक सुद्धा बंद करण्यात आला. त्यामुळे रेल्वेद्वारे होणा:या केळीच्या वाहतुकीऐवजी रस्तामार्गाने होणा:या वाहतुकीला चालना मिळाली. ट्रकद्वारे केळीची वाहतूक केल्यामुळे व्यापा:यांना माल घरपोच व चांगला दर्जा मिळतो, परिणामी रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला, त्यात भाववाढीची भर पडली आहे.