शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महामार्ग झाला बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 17:48 IST

अपघात वाढले : वाहन चालविणे कठीण झाल्याने नागरिक हैराण

भुसावळ : चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने जळगाव- नागपूर महामार्ग धोकादायक बनला असून अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. या मार्गावरुन वाहनधकारकांना वाहन चालविताना अक्षरश: कसरत करावी लागते. जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, अशी अपेक्षा यामुळे व्यक्त होत आहे.दोघे झाले जखमीगुरुवारी सायंकाळी देखील साकेगाव जवळ या महामार्गावर एक अपघात झाला. यात दोघे मोटरसायकलस्वार जखमी झाले. देवीदास लटकन कोळी (५८) रा. साकेगाव हे दुचाकीवरून जात असताना गोदावरी कृषी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी शिवम अनिल चौधरी (२२) रा.विटवे ता.रावेर हा पाठीमागून येत होता. त्याच वेळेस महामार्गावर ट्रक क्रमांक (एम. एच. १९- ए. ए. ७४२९ हा महामार्गावर थांबला होता. या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी निघाले असता त्याच वेळेस कालीपिली ने प्रवासी उतरण्यासाठी रस्त्यावरच ब्रेक मारून दरवाजा उघडला असता मागील दोन्ही दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले व जोराची धडक झाली, यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. साकेगावचे कोळी यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात तर विटवेचा विद्यार्थी यास गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.नेहमीच वाहतुकीचा खोळंबासध्या रस्ता अरुंद झाल्याने किरकोळ अपघात झाल्यास अथवा वाहनांची गर्दी यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचा खोळंबा झाल्यास वेळही वाया जातो. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.