शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

केरळ पूरग्रस्ताना विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:57 IST

सात तासात जमविली १५ हजारांची रक्कम

चोपडा, जि.जळगाव : केरळ येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात प्रचंड वित्तहानी व नुकसान झाले आहे. शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील सेवाभावी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मदत निधी संकलनाचे काम केले आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ व वरीष्ठ), शिक्षण शास्त्र विद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथील परिसरात फिरून विद्यार्थ्यांकडून व शहरातील नारायणवाडी, मेन रोड या भागात फिरून निधी संकलन करण्यात आले.या निधी फेरीला सर्वसामान्य, मान्यवर, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांसह विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने मदत केली. त्यात या विद्यार्थ्यांनी सात तासांत पंधरा हजारांची रक्कम जमा केली आहे.प्रा.प्रदीप पाटील, प्रा.संदीप भास्कर पाटील यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन प्रतिनिधी अनिल बाविस्कर, लोकेश लाटे, मंगेश पाटील, दिव्यांक सावंत, चेतन बाविस्कर, अक्षय पाटील, भुवनेश्वरी पाटील, सनी पाटील, अक्षय वैद्य, समाधान सोनवणे, नरेंद्र मैराळे, कामिल तडवी, विश्वनाथ चौधरी, तन्वीर पिंजारी, दिनेश पाटील, सिकंदर तडवी, लीलाधर बाविस्कर, परेश पवार, छाया काविरे, उर्वेश साळुंखे, शुभम तडवी, तुषार साळुंखे यांनी निधी संकलनाचे काम केले.नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले आहे. दरम्यान, सर्व निधी संकलन झाल्यानंतर केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविला जाणार आहे.

टॅग्स :floodपूरChopdaचोपडा