शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भेटीगाठीसोबत मदतही आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे वृद्धाश्रमात असलेल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भेटता येत नसून या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे वृद्धाश्रमात असलेल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भेटता येत नसून या ठिकाणी होणारी मदतही बंद झाली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या स्थितीत आजी-आजोबा सध्या कोणाच्या भेटीगाठी होत नसल्या तरी ते वृद्धाश्रमात निसर्गरम्य वातावरणात रमले असून एकमेकांसोबत गप्पांचा आनंद लुटत आहे.

काही कारणामुळे कुटुंबापासून दूर असलेले आणि सध्या वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजी-आजोबांचे या कोरोना काळात काय चालले आहे, याविषयी माहिती घेण्यासाठी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी चर्चा केली असता त्यांनी सध्या भेटीगाठी होत नसल्या तरी आम्ही एकमेकांशी चर्चा करून निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आहे, असे आनंदाने सांगितले.

गेल्या वर्षभरापासून उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे सर्व क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यामध्ये वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांनादेखील मर्यादा आल्या आहे. वर्षभरापासून भेटीगाठी बंद झाल्या असून या ठिकाणी भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती आणत असलेले जेवणदेखील बंद आहे. मात्र सध्या वृद्धाश्रमात असलेल्या स्वयंपाक घरातूनच वेगवेगळे प्रकारचे मेनू करून आजी-आजोबांना दिले जात आहे.

मदतही आटली

वृद्धाश्रम असो अथवा निराधार मुलांच्या वसतिगृहात अनेक दाते मदत करीत असतात. मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग उद्भवला व तेव्हापासून वृद्धाश्रम व इतर ठिकाणीदेखील त्याचा परिणाम जाणवत आहे. वृद्धाश्रमात असलेल्या आजी-आजोबांना काही मदत व्हावी म्हणून अनेकदा ते रोख रक्कम अथवा काही वस्तू देत असत. मात्र वर्षभरापासून ही मदत कमी झाली आहे. असे असले तरी मातोश्री वृद्धाश्रमात असलेल्या सर्व ३६ आजी-आजोबांना चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.

भेट देणारे शून्यच

वृद्धाश्रमात असलेल्या या आजी-आजोबांना भेटण्यासाठी पूर्वी दररोज पाच ते दहा जण तरी येत असत. मात्र कोरोना संसर्गामुळे कोणाला भेटू दिले जात नसून आजी-आजोबांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता एका जणाला जर कोणी भेटले तर त्यातून सर्वांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे दक्षता घेतली जात आहे.

वृद्धाश्रमातील एकूण सदस्य ३६

स्त्री २०

पुरुष १६

भेटावे वाटते मात्र काळजीही महत्त्वाची

आम्ही वृद्धाश्रमात असलो तरी आम्हाला भेटण्यासाठी कुटुंबातील सदस्य येत असत. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने त्यांनीही बाहेर पडू नये व आमच्यापैकी कोणाला भेटले तरी संसर्गाची भीती असते. त्यामुळे भेटावे वाटत असले तरी स्वतःची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, असे येथील एका आजोबांनी सांगितले.

आमच्यामुळे इतरांना त्रास नको

वृद्धाश्रमातील सदस्यांना भेटण्यासाठी सध्या कोणी येत नाही. काळजी म्हणून त्यांना येऊ दिले जात नाही. आम्ही भेटायचे वाटले तरी आम्हीच मनाला आवर घालून आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून भेटणे टाळतो, असे देखील एका आजोबांनी सांगितले.

निसर्गरम्य वातावरणात रमलो

सध्या कोरोना संसर्गामुळे भेटीगाठी होत नसल्या तरी येथील सदस्य आम्ही एकमेकांशी चर्चा करून आनंदी आहोत. त्यासोबतच परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहता येथेच आम्ही सर्व सदस्य रमलो असल्याचे एका आजीबाईंनी सांगितले.