शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

जिल्हाभरात जोरदार पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:21 IST

पुरात वाहून बैल ठार : सततच्या रिपरिपीने पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्हाभरात दररोज जोरदार पाऊसस होत असून सततच्या पावसाने पिकांचेच नुकसान होत आहे. नद्या-नाले तुडूंब भरले आहे. अनेक ठिकाणी पिके वाया गेली आहे. तर सतत पाण्यात बुडून जनावरे दगावल्याच्या घटना घडत आहेत.सावद्यात मुसळधारसावदा परिसरात १९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुकाभरात दररोज पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाला लोक कंटाळले असून परिसरातील पिके पिवळी पडत आहेत. गुरुवारी येथील लेंडी गल्लीला नदीचे स्वरूप आले होते. पाताळगंगा नदीत केलेले खोलीकरण पाण्याने तुडुंब भरुन लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले गेले. त्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत होते. तर दुसरीकडे रब्बीच्या पिकाला अति पाण्यामुळे फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उडीद आणि मुगाचे पीक हातून गेल्याचे चित्र आहे.चाळीसगाव तालुक्यात ८७ टक्के पाऊसगेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून चाळीसगाव शहर व तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी पाटणादेवी येथे झालेल्या पावसामुळे पाटणादेवी मंदिराच्या पुलावर पाणी आले होते. त्यामुळे भाविक व पर्यटकांनी सतर्कता बाळगत मंदिरातून काढता पाय घेतला. वलठाण तसेच कोदगाव परिसरातही झालेल्या जोरदार पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात सततच्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असून खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे जिकरीचे ठरत आहे.तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६०.०६ मि.मी. इतके आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार तालु्क्यात ५७६ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. ही सरासरी ८७.३ टक्के इतकी आहे. गतवर्षी याच तारखेला तालुक्यात केवळ ४४२.८ मि.मी. इतका म्हणजे वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार असून टँकरच्या खेपाही वाचणार आहेत. तसेच सिंचनाचीही समस्या मिटणार आहे.चोपडा : सरासरीच्या १११ टक्केतालुक्यात यावर्षी सरासरी १११ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली असून जवळपास पाच वर्षांनंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत होते. मात्र या वर्षी तालुक्यातील ६९१ मिमी. सरासरी पावसाची नोंद मोडीत ७६८.०५७ मिलिमीटर एवढा पाऊस तालुक्यात झाला. मंडळनिहाय आकडेवारी : चोपडा- ७७४ मिमी, अडावद- ८१७ मिमी, धानोरा- ८८५ मिमी, चहार्डी- ७२१ मिमी, गोरगावले- ६२१ मिमी, हातेड- ७१५ मिमी, लासूर- ८५३ मिमी. एकूण ५ हजार ३७६ मिमी पाऊस झाला असून सरासरी ७११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

 

म्हैस वाहून गेली, नदीत जीप पडली... अजिंठा घाटमाथावर झालेल्या जोरदार पावसामुळे तोंडापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून पुरात म्हैस वाहून गेली. गुरुवारी तोंडापूर येथे गावातील पुलावरुन जात असलेली जीप नदीत पडली, मात्र कोणतीही जिवीत हानी झाली नाही.