शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

जिल्हाभरात जोरदार पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:21 IST

पुरात वाहून बैल ठार : सततच्या रिपरिपीने पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्हाभरात दररोज जोरदार पाऊसस होत असून सततच्या पावसाने पिकांचेच नुकसान होत आहे. नद्या-नाले तुडूंब भरले आहे. अनेक ठिकाणी पिके वाया गेली आहे. तर सतत पाण्यात बुडून जनावरे दगावल्याच्या घटना घडत आहेत.सावद्यात मुसळधारसावदा परिसरात १९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुकाभरात दररोज पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाला लोक कंटाळले असून परिसरातील पिके पिवळी पडत आहेत. गुरुवारी येथील लेंडी गल्लीला नदीचे स्वरूप आले होते. पाताळगंगा नदीत केलेले खोलीकरण पाण्याने तुडुंब भरुन लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले गेले. त्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत होते. तर दुसरीकडे रब्बीच्या पिकाला अति पाण्यामुळे फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उडीद आणि मुगाचे पीक हातून गेल्याचे चित्र आहे.चाळीसगाव तालुक्यात ८७ टक्के पाऊसगेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून चाळीसगाव शहर व तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी पाटणादेवी येथे झालेल्या पावसामुळे पाटणादेवी मंदिराच्या पुलावर पाणी आले होते. त्यामुळे भाविक व पर्यटकांनी सतर्कता बाळगत मंदिरातून काढता पाय घेतला. वलठाण तसेच कोदगाव परिसरातही झालेल्या जोरदार पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात सततच्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असून खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे जिकरीचे ठरत आहे.तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६०.०६ मि.मी. इतके आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार तालु्क्यात ५७६ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. ही सरासरी ८७.३ टक्के इतकी आहे. गतवर्षी याच तारखेला तालुक्यात केवळ ४४२.८ मि.मी. इतका म्हणजे वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार असून टँकरच्या खेपाही वाचणार आहेत. तसेच सिंचनाचीही समस्या मिटणार आहे.चोपडा : सरासरीच्या १११ टक्केतालुक्यात यावर्षी सरासरी १११ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली असून जवळपास पाच वर्षांनंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत होते. मात्र या वर्षी तालुक्यातील ६९१ मिमी. सरासरी पावसाची नोंद मोडीत ७६८.०५७ मिलिमीटर एवढा पाऊस तालुक्यात झाला. मंडळनिहाय आकडेवारी : चोपडा- ७७४ मिमी, अडावद- ८१७ मिमी, धानोरा- ८८५ मिमी, चहार्डी- ७२१ मिमी, गोरगावले- ६२१ मिमी, हातेड- ७१५ मिमी, लासूर- ८५३ मिमी. एकूण ५ हजार ३७६ मिमी पाऊस झाला असून सरासरी ७११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

 

म्हैस वाहून गेली, नदीत जीप पडली... अजिंठा घाटमाथावर झालेल्या जोरदार पावसामुळे तोंडापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून पुरात म्हैस वाहून गेली. गुरुवारी तोंडापूर येथे गावातील पुलावरुन जात असलेली जीप नदीत पडली, मात्र कोणतीही जिवीत हानी झाली नाही.