शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

जिल्हाभरात जोरदार पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:21 IST

पुरात वाहून बैल ठार : सततच्या रिपरिपीने पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्हाभरात दररोज जोरदार पाऊसस होत असून सततच्या पावसाने पिकांचेच नुकसान होत आहे. नद्या-नाले तुडूंब भरले आहे. अनेक ठिकाणी पिके वाया गेली आहे. तर सतत पाण्यात बुडून जनावरे दगावल्याच्या घटना घडत आहेत.सावद्यात मुसळधारसावदा परिसरात १९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुकाभरात दररोज पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाला लोक कंटाळले असून परिसरातील पिके पिवळी पडत आहेत. गुरुवारी येथील लेंडी गल्लीला नदीचे स्वरूप आले होते. पाताळगंगा नदीत केलेले खोलीकरण पाण्याने तुडुंब भरुन लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले गेले. त्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत होते. तर दुसरीकडे रब्बीच्या पिकाला अति पाण्यामुळे फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उडीद आणि मुगाचे पीक हातून गेल्याचे चित्र आहे.चाळीसगाव तालुक्यात ८७ टक्के पाऊसगेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून चाळीसगाव शहर व तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी पाटणादेवी येथे झालेल्या पावसामुळे पाटणादेवी मंदिराच्या पुलावर पाणी आले होते. त्यामुळे भाविक व पर्यटकांनी सतर्कता बाळगत मंदिरातून काढता पाय घेतला. वलठाण तसेच कोदगाव परिसरातही झालेल्या जोरदार पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात सततच्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असून खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे जिकरीचे ठरत आहे.तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६०.०६ मि.मी. इतके आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार तालु्क्यात ५७६ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. ही सरासरी ८७.३ टक्के इतकी आहे. गतवर्षी याच तारखेला तालुक्यात केवळ ४४२.८ मि.मी. इतका म्हणजे वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार असून टँकरच्या खेपाही वाचणार आहेत. तसेच सिंचनाचीही समस्या मिटणार आहे.चोपडा : सरासरीच्या १११ टक्केतालुक्यात यावर्षी सरासरी १११ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली असून जवळपास पाच वर्षांनंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत होते. मात्र या वर्षी तालुक्यातील ६९१ मिमी. सरासरी पावसाची नोंद मोडीत ७६८.०५७ मिलिमीटर एवढा पाऊस तालुक्यात झाला. मंडळनिहाय आकडेवारी : चोपडा- ७७४ मिमी, अडावद- ८१७ मिमी, धानोरा- ८८५ मिमी, चहार्डी- ७२१ मिमी, गोरगावले- ६२१ मिमी, हातेड- ७१५ मिमी, लासूर- ८५३ मिमी. एकूण ५ हजार ३७६ मिमी पाऊस झाला असून सरासरी ७११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

 

म्हैस वाहून गेली, नदीत जीप पडली... अजिंठा घाटमाथावर झालेल्या जोरदार पावसामुळे तोंडापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून पुरात म्हैस वाहून गेली. गुरुवारी तोंडापूर येथे गावातील पुलावरुन जात असलेली जीप नदीत पडली, मात्र कोणतीही जिवीत हानी झाली नाही.