शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : चाळीसगाव, भडगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पावसाच्या टक्केवारीने गाठली शंभरी

By ajay.patil | Updated: September 20, 2022 16:43 IST

पाचोरा, धरणगाव, एरंडोलमध्येही जोरदार; बहाळ, पिंपळगाव महसुल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक तालुक्यांमध्ये तुफान पाऊस होत असून, सोमवारी भडगाव, चाळीसगाव तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. सलग दोन दिवस या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यासह पाचोरा, एरंडोल व धरणगाव तालुक्यात देखील सोमवारी रात्री व दिवसा देखील जोरदार पाऊस झाला आहे.

सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होत असतो. यावर्षी मान्सून लवकर परतीच्या मार्गाला लागेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसीत होत असल्याने मान्सूनचा मुक्काम देखील वाढवला आहे. सोमवारी जिल्ह्यातील गिरणा काठलगतच्या जवळजवळ सर्वच सहा तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कापूस, सोयाबीन पीकाचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी कापूस वेचणीवर आला असतानाच सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाने गाठली शंभरीजिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान एकूण सरासरीच्या ९८ टक्के इतका पाऊस होत असतो. जिल्ह्यात एकूण पावसाची सरासरी ६३२ मिमी इतकी असते. मात्र, २० सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

बहाळ, पिंपळगाव महसुल मंडळामध्ये अतिमुसळधार पाऊसचाळीसगाव तालुक्यातील बहाळ महसुल मंडळात एकाच दिवसात तब्बल १४३ मिमी पाऊस झाला आहे. तर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव या महसुल मंडळात १०७ मिमी पाऊस झाला आहे. दोन्ही महसुल मंडळांमध्ये एकाच दिवसात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यासह चाळीसगाव मंडळात ८३, शिरसगाव ६७, मेहुणबारे ७५, हातले ८३, तळेगाव ६७, खडकी ७० अशा सर्वच महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर भडगाव तालुक्यातील कजगाव महसुल मंडळात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली असून, या मंडळात ९४ मिमी पाऊस झाला.

जिल्ह्यात यलो अलर्टबंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात २३ पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पावसासोबतच वीजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी दरम्यान राहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र ज्या प्रकारे मध्यप्रदेश व विदर्भाच्या दिशेने सरकेल त्याच प्रमाणे जिल्ह्यात पावसाचाही वेग वाढण्याचा अंदाज आहे.