शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला दमदार पावसाने तितूरला मोठा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST

३१ ऑगस्ट, त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणि मंगळवारी सायंकाळी पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या ...

३१ ऑगस्ट, त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणि मंगळवारी सायंकाळी पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गत २२ दिवसांत तितूरला तिसऱ्यांदा पूर आल्याने ३१ ऑगस्टच्या महापुराच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

तालुक्यात सोमवार अखेर ९१७.७३ इतके विक्रमी पर्जन्यमान झाले आहे. तहसीलदार अमोल मोरे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी नव्या पुलावर जाऊन तितूरच्या पूरस्थितीचा आढावा घेतला.

विक्रमी पर्जन्यमान झाले असून पाऊस अजूनही सुरूच असल्याने खरीप हंगामाचा चिखलच झाला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या - आमदारांची मागणी

अतिवृष्टी व पुराचे पंचनामे सुरू असताना पुन्हा पुराने धडक दिल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. पूरग्रस्तांसह शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

........

चौकट

कपाशीला मोठा फटका

अगोदरच अतिवृष्टीने कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने पुन्हा आलेल्या पावसाने कपाशी पिकाचा चिखल करून टाकला आहे. अति पावसामुळे जमिनीलगतची कपाशी बोंडे सडण्यास सुरुवात झाली आहे. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने पानेही लाल पडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आभाळ दाटून आले आहे. बाजरी, ज्वारी पिकेही मातीमोल झाली असून सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काढणीला धान्य आणि काढून ठेवलेली कणसे काळी पडणार आहे. दरम्यान, मका पिकास हा पाऊस लाभदायी ठरणार आहे.

........

चौकट

‘मन्याड’मधून विक्रमी पाण्याचा विसर्ग

नांदगावसह मन्याड परिसरातही दमदार पाऊस होत आहे. यामुळे अगोदरच ओव्हरफ्लो झालेल्या मन्याड धरणातून विक्रमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारअखेर सुरू असलेला एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत पोहोचला आहे.

1...नांद्रे, पिलखोड, सायगाव या नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असे सूचना गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.