शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By admin | Updated: September 19, 2015 00:21 IST

कपाशीचे अतोनात नुकसान : शेंदुर्णी परिसरात पिकांना फटका

जळगाव- शहरासह जिल्हाभरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, यावल, पाचोरा या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये 16 तासात 60 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

24 तासात 939.71 मि.मी. पाऊस

गुरुवारी दुपारी 4.20 वाजेपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेर्पयत सुरूच होता. सुरुवातीला मध्यम स्वरूपाच्या पावसाने रात्री जोर धरला. सकाळर्पयत जोरदार पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासात जिल्हाभरात तब्बल 939.71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात सर्वाधिक 116.75 मि.मी. पावसाची नोंद जामनेर तालुक्यात, तर सर्वात कमी 35.75 मि.मी. पावसाची नोंद भडगाव तालुक्यात झाली आहे. जळगाव तालुक्यात 79.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तीन महिन्यानंतर गिरणा वाहू लागली

13 ते 17 जून यादरम्यान एरंडोल, पाचोरा, भडगाव भागात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा नदीला प्रवाही पाणी आले होते. नंतर जुलै, ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस नसल्याने नदीमधील पाणी आटले होते. गिरणा नदीकाठावरील भागात म्हणजेच पाचोरा, भडगाव, जळगाव, चाळीसगाव, एरंडोलात ब:यापैकी पाऊस झाल्याने गिरणा नदीला पाणी आले आहे.

शेंदुर्णीत लाखोंचे नुकसान

शेंदुर्णी परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतातील झाडे, इलेक्ट्रिक पोल पडून मोठे नुकसान झाले. तसेच काही ठिबकवर असलेल्या केळीच्या बागा, कपाशी व मका पूर्णपणे झोपला. नदीकाठी असलेल्या मांगरवाडी, कोळी समाजातील ब:याच लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा संसार उघडय़ावर पडला. पुरामुळे बेघर झालेल्या 200-250 लोकांना जेवणाची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण चौधरी व त्यांच्या मित्र परिवाराने शाळेत केली. जि.प. सदस्य संजय गरुड, पंचायत समिती सदस्य शांताराम गुजर, जि.प. माजी सदस्या समिती सरोजिनी गरुड, जि.प. माजी सदस्य सागरमल जैन, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पंडितराव जोहरे यांनी गावात फिरून नुकसान झालेल्या घरांना भेटी देऊन मदत केली.

गावात सलग 12 तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

एरंडोल तालुक्यात 15 तास पाऊस

एरंडोल तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी 11 वाजेर्पयत पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. मात्र सुदैवाने कुठेही प्राणहानी अथवा वित्तहानी झाली नाही. अंजनी धरणाच्या क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाणीसाठय़ात वाढ झालेली नाही. सर्वाधिक म्हणजे 112 मि.मी. पाऊस रिंगणगाव मंडळात झाला. उत्राण मंडळात 75 मि.मी., कासोदा मंडळ 53 व एरंडोल मंडळात 35 मि.मी. जलवृष्टी झाली. शुक्रवारअखेर 413 मि.मी. पाऊस झाला.