शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

गारपीट व वादळामुळे रब्बीचे पिकाचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:14 IST

‘कोरोना’ नंतर आता निसर्गाचाही कहर, गहू, हरभऱ्याला फटका

जळगाव : शहरासह तालुक्यातील भोकर, आव्हाणे, ममुराबाद, कानळदा, गाढोदा, किनोद गिरणा व तापी काठच्या गावांमध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपीटी झाली. त्यात गहू, हरभºयासह केळीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सूमारेतासभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले गेले आहे. आधीच ‘कोरोना’मुळे शेतीचे व्यवहार ठप्प असताना आता निसर्गानेही आपले रौद्ररुप दाखविल्याने शेतकºयांचा चिंता वाढल्या आहेत.जळगाव शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील गाढोदा, पळसोद भोकर, कठोरा, किनोद , आव्हाणे या भागात जोरदार वाºयासह झालेल्या पाऊस व गारपीटीने चांगलाच हाहाकार माजवला. म्हसावद, वडली, जळके या भागात वादळ होते. ऐन काढणीवर असलेल्या गहू व हरभºयाचा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.भोकर भागात अर्धातात गारपीटतहसिलदार वैशाली हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोकर पट्टयात मोठे नुकसान झाले असून, या भागात अर्धातास गारपीट झाली आहे. रात्री उशीरापर्यंत नुकसानीचा आढावा घेतला जात होता.ममुराबादला घरांवरील पत्रे उडालेममुराबाद : परिसरात मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या गहू, दादर ज्वारी पिकांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे काही घरांवरील पत्रेही उडाली आहेत.दिवसभर कडक ऊन व उकाड्याची स्थिती असतांना सायंकाळनंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला. वाºयाचा वेग वाढून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाट व पाऊस सुरू होता. साधारण पाच मिनिटे बोरांच्या आकाराची गार पडली. रस्त्यांवर तसेच घरांच्या अंगणात अक्षरश: गारांचा सडा पडल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांचे गारपिटीमुळे काय हाल झाले असतील, या कल्पनेनेच शेतकºयांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. वादळामुळे दत्त मंदिराजवळील श्रीराम यादव यांच्या घरावरील पत्रेही उडाली.गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू झाला आडवा२५ ते ३० किमी प्रतीतास वेगाने वाहणाºया वाºयामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, गाढोदा ते आव्हाणे या केळी पट्टयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे. यासह पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू व हरभºयाचे पिक अक्षरश आडवे झाले होते. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा आढावा घेवून शेतकºयांना मदत करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव