शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:26 IST

- एकनाथराव खडसे, माजी मंत्री

महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिले होते व सर्वसामान्यांची इच्छा देखील महायुतीचे सरकार यावे हीच होती.दुर्दैवाने सेनेने माघार घेतल्याने समीकरण बदलले. युतीचे सरकार यावे आणि स्थिर सरकार यावे अशी आपली अपेक्षा आहे. मात्र मधल्या कालखंडात सेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा विभिन्न विचारांच्या तडजोडी सुरू झाल्या. त्यामुळे हे सरकार टीकेल की नाही ही शंकाच होती.हे स्थिर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल असून राजकारणातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. स्थिर सरकार येईल व दिलेली वचने देखील पूर्ण होतील. यासाठी मात्र वाट बघावी लागेल. शिवसेनेने स्वत:हून ओढवून घेतलेली ही परिस्थिती असून, महा विकास आघाडी करताना मने जोडलेली नाहीत.केवळ भाजपाचे सरकार नको म्हणून सर्वांनी एकत्र येऊन कोणालाही विश्वासात न घेता उचललेले हे पाऊल आहे.अजित पवार यांनी हे पाऊल उचलले याच्या मागील अर्थ हाच असावा की मने जुळली नव्हती. मनाने, तत्वाने व विचाराने एकत्र न आल्याने सेना काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार बनू शकले नाही. तत्व बाजूला ठेवून अशा गोष्टी घडत असतील तर राजकारणातील हे अनाकलनीय असे दुर्दैव आहे, अशी भूमिका माजी आमदार, माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.