शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:26 IST

- एकनाथराव खडसे, माजी मंत्री

महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिले होते व सर्वसामान्यांची इच्छा देखील महायुतीचे सरकार यावे हीच होती.दुर्दैवाने सेनेने माघार घेतल्याने समीकरण बदलले. युतीचे सरकार यावे आणि स्थिर सरकार यावे अशी आपली अपेक्षा आहे. मात्र मधल्या कालखंडात सेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा विभिन्न विचारांच्या तडजोडी सुरू झाल्या. त्यामुळे हे सरकार टीकेल की नाही ही शंकाच होती.हे स्थिर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल असून राजकारणातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. स्थिर सरकार येईल व दिलेली वचने देखील पूर्ण होतील. यासाठी मात्र वाट बघावी लागेल. शिवसेनेने स्वत:हून ओढवून घेतलेली ही परिस्थिती असून, महा विकास आघाडी करताना मने जोडलेली नाहीत.केवळ भाजपाचे सरकार नको म्हणून सर्वांनी एकत्र येऊन कोणालाही विश्वासात न घेता उचललेले हे पाऊल आहे.अजित पवार यांनी हे पाऊल उचलले याच्या मागील अर्थ हाच असावा की मने जुळली नव्हती. मनाने, तत्वाने व विचाराने एकत्र न आल्याने सेना काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार बनू शकले नाही. तत्व बाजूला ठेवून अशा गोष्टी घडत असतील तर राजकारणातील हे अनाकलनीय असे दुर्दैव आहे, अशी भूमिका माजी आमदार, माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.