शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

रिक्षा चालवताना प्रकृती बिघडली, थांबवताच खाली पडून चालक ठार; उष्माघात की ह्रदयविकार

By विजय.सैतवाल | Updated: March 24, 2024 18:06 IST

रविवार, २४ मार्च रोजी जळगावचा पारा ४० अंशावर पोहचला. त्यामुळे उन्हाचे चांगलेच चटके जाणवत होते. शिंपी यांना भरदुपारी उष्माघाताचा फटका बसला की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जळगाव : चालत्या रिक्षामध्ये त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबवताच रिक्षातून खाली पडून संजय आधार शिंपी (५५, रा. अर्जुन नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, २४ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. शिंपी यांचा मृत्यू नेमका उष्माघाताने की ह्रदयविकाराने झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे.

अर्जुन नगरमधील रहिवासी असलेले संजय शिंपी हे रिक्षाचालक होते. रविवारी दुपारी ते बसस्थानकाकडून जिल्हा क्रीडा संकुलाकडे रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३१६७) घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांना त्रास होऊ लागला. त्या मुळे त्यांनी रिक्षा थांबवली व काही क्षणातच ते खाली कोसळले. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनास्थळावरील परिचयातील व्यक्तीने शिंपी यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी कुटुंबीय व इतर नातेवाईक रुग्णालयात पोहचले.

पारा ४० अंशावर, उष्माघाताची शक्यता?

रविवार, २४ मार्च रोजी जळगावचा पारा ४० अंशावर पोहचला. त्यामुळे उन्हाचे चांगलेच चटके जाणवत होते. शिंपी यांना भरदुपारी उष्माघाताचा फटका बसला की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तसेच शिंपी यांना ह्रदयाचाही त्रास असल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला की काय, हे नेमके शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

जेवण करून निघाले अन् काही वेळात मृत्यूची वार्ता आली

होळीचा सण असल्याने दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान शिंपी यांनी घरी जेवण केले व ते रिक्षा घेऊन बाहेर पडले होते. त्याच्या काही वेळातच त्यांच्या मृत्यूची वार्ता घरी पोहचली. ऐन होळी सणाच्या दिवशी घराचा आधार गेल्याने शिंपी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वर्षभरापूर्वीच शिंपी यांच्या भावाचे निधन झाले. त्यामुळे ते सारखे विचारातदेखील राहत होते. त्यामुळे त्यांची प्रकृती काहीसी नाजूकच होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

ज्या रिक्षावर उदरनिर्वाह त्याच रिक्षाने मृतदेह नेण्याची वेळ

शिंपी यांचा रिक्षावरच उदरनिर्वाह होता. ज्यावर उदरनिर्वाह चालायच्या त्याच रिक्षातून ते खाली पडले व नागरिकांनी या रिक्षामधूनच त्यांना रुग्णालयात नेले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.