शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

स्वच्छतागृहाकडे कोणी, कधी गेलेच नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:39 IST

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सवाल : वृद्धेच्या बळीनंतर झाल्यानंतर झाल्या दोन बैठका

जळगाव : महिला बेपत्ता झाली त्या दिवसापासून स्वच्छतागृहाकडे कोणी गेलेच नाही का? असा सवाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित करीत महिला बेपत्ता झाली असताना पोलीस का आले नाही, या बाबतही विचारणा केली. तसेच तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत महिला बेपत्ता असताना रुग्णालयात का शोधले नाही, असा सवाल उपस्थित केला. येथे दोष आहे, म्हणूनच एवढा मोठा गोंधळ झाला, असा ठपकाही ठेवला.वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन बैठक घेतली. विशेष म्हणजे वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर दोन बैठका झाल्या. महिला बेपत्ता झाली त्या वेळी दखल का घेतली गेली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.असाही संशयमृत्यू झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची दुर्गंधी येण्यास सुरूवात होते़ सात नंबरचा वॉर्ड ज्या स्वच्छतागृहात हा मृतदेह आढळला तो नियमित वावर असलेल्या भागात आहे़ अशा स्थितीत आता दुर्गंधी येऊन मृतदेहाचा तपास लागणे म्हणजे केवळ तीन ते चार दिवसांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला असेल, सुरूवातीचे काही दिवस महिला बेशुद्धाअवस्थेत असू शकते, असाही एक संशय व्यक्त करण्यात आला आहे़ कदाचित आधीचे दोन दिवस तपास केला असता तर महिला जीवंत आढळून आली असती, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे़स्वच्छतागृहात कोणी जात आहे का नाही?जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजेच्या सुमारास अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली़ यावेळी स्वच्छता कर्मचारी नेमके कोण, स्वच्छतागृहात कोणी जात आहे का नाही? याबद्दल माहिती घेत त्या दिवशी नेमके कोण कर्तव्यावर होते याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. या वेळी परिचारिकांकडूनही माहिती घेण्यात आली़ साधारण अर्धातास ही बैठक झाली़ त्यानंतर पालकमंत्र्यांनी दहा ते पंधरा मिनिटे अधिष्ठाता कार्यालयात सर्व घटना व माहिती जाणून घेतली़कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजीकोविड रुग्णालयाच्या कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित वृद्धा बेपत्ता असताना या बाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच या बाबत केवळ एका पोलीस कर्मचाºयाला दूरध्वनीवरून कळविल्याचे केस पेपरवरून आढळून आले. एवढा गंभीर प्रकार असतानाही प्रमुख याकडे लक्ष देत नसतील तर कारभार कसा चालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.नावांचाही खेळ१ जून रोजी मालती नेहेते यांची तब्येत खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जळगावच्या कोविड रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. भुसावळ येथून त्यांचे नाव चुकीचे पाठवण्यात आल्याने कोविड रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद मालती सुदाणे अशी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव