शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

स्वच्छतागृहाकडे कोणी, कधी गेलेच नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:39 IST

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सवाल : वृद्धेच्या बळीनंतर झाल्यानंतर झाल्या दोन बैठका

जळगाव : महिला बेपत्ता झाली त्या दिवसापासून स्वच्छतागृहाकडे कोणी गेलेच नाही का? असा सवाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित करीत महिला बेपत्ता झाली असताना पोलीस का आले नाही, या बाबतही विचारणा केली. तसेच तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत महिला बेपत्ता असताना रुग्णालयात का शोधले नाही, असा सवाल उपस्थित केला. येथे दोष आहे, म्हणूनच एवढा मोठा गोंधळ झाला, असा ठपकाही ठेवला.वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन बैठक घेतली. विशेष म्हणजे वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर दोन बैठका झाल्या. महिला बेपत्ता झाली त्या वेळी दखल का घेतली गेली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.असाही संशयमृत्यू झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची दुर्गंधी येण्यास सुरूवात होते़ सात नंबरचा वॉर्ड ज्या स्वच्छतागृहात हा मृतदेह आढळला तो नियमित वावर असलेल्या भागात आहे़ अशा स्थितीत आता दुर्गंधी येऊन मृतदेहाचा तपास लागणे म्हणजे केवळ तीन ते चार दिवसांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला असेल, सुरूवातीचे काही दिवस महिला बेशुद्धाअवस्थेत असू शकते, असाही एक संशय व्यक्त करण्यात आला आहे़ कदाचित आधीचे दोन दिवस तपास केला असता तर महिला जीवंत आढळून आली असती, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे़स्वच्छतागृहात कोणी जात आहे का नाही?जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजेच्या सुमारास अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली़ यावेळी स्वच्छता कर्मचारी नेमके कोण, स्वच्छतागृहात कोणी जात आहे का नाही? याबद्दल माहिती घेत त्या दिवशी नेमके कोण कर्तव्यावर होते याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. या वेळी परिचारिकांकडूनही माहिती घेण्यात आली़ साधारण अर्धातास ही बैठक झाली़ त्यानंतर पालकमंत्र्यांनी दहा ते पंधरा मिनिटे अधिष्ठाता कार्यालयात सर्व घटना व माहिती जाणून घेतली़कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजीकोविड रुग्णालयाच्या कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित वृद्धा बेपत्ता असताना या बाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच या बाबत केवळ एका पोलीस कर्मचाºयाला दूरध्वनीवरून कळविल्याचे केस पेपरवरून आढळून आले. एवढा गंभीर प्रकार असतानाही प्रमुख याकडे लक्ष देत नसतील तर कारभार कसा चालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.नावांचाही खेळ१ जून रोजी मालती नेहेते यांची तब्येत खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जळगावच्या कोविड रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. भुसावळ येथून त्यांचे नाव चुकीचे पाठवण्यात आल्याने कोविड रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद मालती सुदाणे अशी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव