शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नगरसेवकांना हवीय सहानुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 12:38 IST

-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने ...

-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळविला असून, जप्त माल मिळावा यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातूनही प्रयत्न केला जात आहे.दरम्यान, मनपा निवडणूक जवळ आल्यामुळे ज्यांच्याकडून सहानुभुती मिळेल त्यांच्याकडून सहानुभूती मिळविण्यावर नगरसेवकांचा भर दिसून येत आहे. यामुळे अनेक नगरसेवकांकडून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचारी व अधीक्षकांशी खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लवकरच नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे हे रूजू होणार आहेत. त्यामुळे मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी काही थोड्या दिवसात शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावून आपली बाजू सांभाळण्यावर देखील भर दिला आहे. एकीकडे नगसेवकांना हॉकर्सला पाठींबा देवून निवडणुकांसाठी सहानूभुती मिळून घ्यायची आहेतर आयुक्त पदाचा कार्यकाळात शहरात लावलेली शिस्त यासाठी प्रभारी आयुक्तांची कारवाई, या दोन मुद्यावरुन मनपा प्रशासन व नगरसेवक आमने-सामने आले आहेत. गेल्याच आठवड्यात खाविआ नगरसेवक नितीन बरडे यांचा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्याशी झालेला वाद यासह भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी देखील पत्र काढून जप्त करण्यात आलेला माल परत देण्याची केलेली मागणी यावरुन हे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या वाढत्या दबावाला थारा जप्त करण्यात आलेला मालाचा लवकरच लिलाव करण्याच्या हालचाली देखील मनपाने सुरु केल्या आहेत. दरम्यान, मनपा महासभेने अतिक्रमण कारवाईबाबत ठराव केला होता. या ठरावामध्ये एका हॉकर्सचा माल पहिल्यांदा पकडला तर त्याच्यावर ५०० रुपये दंड ठोठावला जाणार होता. तर दुसऱ्यांदा माल पकडला त्याच्यावर १ हजार रुपये दंड ठोठवण्याचा व तिसºयांदा माल पकडला तर त्याचा माल कायमसाठी जप्त करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, हा ठराव मनपा प्रशासनाने गेल्याच महिन्यात शासनाकडे विखंडनासाठी पाठविल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवक यांच्यामध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव