शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

नगरसेवकांना हवीय सहानुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 12:38 IST

-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने ...

-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळविला असून, जप्त माल मिळावा यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातूनही प्रयत्न केला जात आहे.दरम्यान, मनपा निवडणूक जवळ आल्यामुळे ज्यांच्याकडून सहानुभुती मिळेल त्यांच्याकडून सहानुभूती मिळविण्यावर नगरसेवकांचा भर दिसून येत आहे. यामुळे अनेक नगरसेवकांकडून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचारी व अधीक्षकांशी खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लवकरच नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे हे रूजू होणार आहेत. त्यामुळे मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी काही थोड्या दिवसात शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावून आपली बाजू सांभाळण्यावर देखील भर दिला आहे. एकीकडे नगसेवकांना हॉकर्सला पाठींबा देवून निवडणुकांसाठी सहानूभुती मिळून घ्यायची आहेतर आयुक्त पदाचा कार्यकाळात शहरात लावलेली शिस्त यासाठी प्रभारी आयुक्तांची कारवाई, या दोन मुद्यावरुन मनपा प्रशासन व नगरसेवक आमने-सामने आले आहेत. गेल्याच आठवड्यात खाविआ नगरसेवक नितीन बरडे यांचा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्याशी झालेला वाद यासह भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी देखील पत्र काढून जप्त करण्यात आलेला माल परत देण्याची केलेली मागणी यावरुन हे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या वाढत्या दबावाला थारा जप्त करण्यात आलेला मालाचा लवकरच लिलाव करण्याच्या हालचाली देखील मनपाने सुरु केल्या आहेत. दरम्यान, मनपा महासभेने अतिक्रमण कारवाईबाबत ठराव केला होता. या ठरावामध्ये एका हॉकर्सचा माल पहिल्यांदा पकडला तर त्याच्यावर ५०० रुपये दंड ठोठावला जाणार होता. तर दुसऱ्यांदा माल पकडला त्याच्यावर १ हजार रुपये दंड ठोठवण्याचा व तिसºयांदा माल पकडला तर त्याचा माल कायमसाठी जप्त करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, हा ठराव मनपा प्रशासनाने गेल्याच महिन्यात शासनाकडे विखंडनासाठी पाठविल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवक यांच्यामध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव