शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सखी-सखीतलं हितगूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:40 IST

नंदुरबार येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा.सविता पटेल यांनी अक्षय तृतीयेनिमित्त सखी-सखीतले हितगूूज मांडण्याचा केलेला प्रयत्न...

अक्षय तृतीयेसंदर्भात अनेक लोककथा, लोकसमज, आख्यायिका आपणास लोकसाहित्यातून तसेच धार्मिक ग्रंथातून वाचावयास मिळतात. कुणबी लोक या सणास ‘आखाजी’ म्हणतात तर गुजर लोक या सणास ‘आखात्री’ या नावाने संबोधतात.अक्षय तृतीयेच्या दिवशी नांगराच्या फाळाला किंवा वखराच्या पासला सोन्याची अंगठी घासून सकाळी औताला बैल जोडून अंगणात उभे करतात. घरधनीण त्यांची पूजा करते. गूळ व धन्याचा प्रसाद देऊन औत शेतात किमान पाच फेऱ्या लावण्यासाठी नेतात. शेतीकामाला मंगल प्रार्थना करून आराधना करण्यात शेतकरी समाज धन्यता मानतो. फळांचा राजा आंबा असल्याने आमरस पुरणाची पोळी जेवणाचे महत्त्व या दिवशी आहे. गुजर समाजात यासाठी ‘सवाष्ण’ (गोळन्यो) जेवू घालण्याचीदेखील पद्धत आहे. बºयाच समाजात कलश व डांगर पूजनाचे महत्त्वदेखील अबाधित आहे. चार मातीचे ठोकळे ठेवून त्यावर माठाची स्थापना करून डेरगं भरण्याची प्रथा आहे. जमलेले सर्व घरातील मंडळी बोटाचा स्पर्श करतात आणि माठाच्या हालचाली पाहून या वर्षी किती पाऊस येईल याचा अंदाज लावतात. गुजर समाजात ५० वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेला कोणीही पाहुणा कोणत्याही नातेवाइकाकडे मुक्कामी जायचा नाही, अशी पद्धत होती. आज मात्र तसे मानले जात नाही. एक-दोन तासात महत्त्वाचे काम असल्यास पाहुणा म्हणून जाऊ शकतात. याचे दुसरे कारण असे की ‘गजरानू’ परिसरातील गावे ही तासाभराच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आपले काम आटोपल्यावर सायंकाळपर्यंत आपल्या घरी परत येऊ शकतात. पूर्वी वाहनांची कमतरता असल्याने ही पद्धत रूढ होती व म्हणून सणासुदीला कोणाकडे जात नसत. आखाजीला सखी-सखीतलं हितगुज मांडायचे. हमखास खात्रीचे (खातरी) श्रद्धास्थान म्हणजे कडुनिंबाला हेलकावणाºया आखाजीच्या झोक्यासोबत स्त्री मन मोकळे होते हे एका गुजरी लोकगीतातून स्पष्ट होते.मारा पियरणो वाडो वाडानो लिंबडो लिंबडानो हिचको सखीनो गराडो पछि सु गावानो संसारणो पवाडो आखात्री आखात्री आय आखात्रीणी वात।गयी आखात्री कणतीन हू देखी रहती वाट।याप्रमाणे स्त्री मन हलके होते तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. नव्याने शेती करायचे तो हाच सुदिन मानून पूज्य मानला जातो. या सणाचे जसे सामाजिक महत्त्व आहे तसेच धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे.-प्रा.सविता पटेल, नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार