शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दरवर्षीची शुभेच्छा कार्डे स्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:48 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘शुभेच्छा कार्ड’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक जयंत पाटील...

कला आणि कौशल्य हे दोन स्वतंत्र भाग आहेत़ यातली सीमारेषा पुसट आहे़ कला कधीच शिकता किंवा शिकवता येत नाही़ आपण शिकतो, ते कौशल्य़मी आनंदवनात असताना १९७८ साली बालमेळावा झाला होता़ संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मुलं आली होती़ सोबत यदुनाथ थत्ते, मु़ ब़ शहा, चित्रकार दिलीप भंडारे अशी बरीच मंडळी आली होती़ एका मोठ्या हॉलमध्ये सर्व मुलांना पाठवून त्यांना चित्रकला साहित्य - पेपर, रबर, पेन्सील आणि रंग देण्यात आले आणि त्यांना सांगितलं गेलं़ ‘काहीही’ काढा’, असे सांगितल्यावर मुले गोंधळली, कारण त्यांना सवय झालेली होती की, सीन काढ झाड, डोंगर, नदी काढ काहीही काढा असं मुलांना कधीच सांगितलं गेलं नव्हतं़ आम्ही हॉलचे दार लावून घेतले आणि अर्ध्या तासाने दार उघडून आत गेलो़ एका मुलाने हत्तीचं चित्र काढलं होतं़ आणि हत्तीच्या डोक्यावर दोन मोठी मोठी शिंगे काढली होती़ यदुनाथजींनी त्या मुलाला विचारले , ‘बाळ तू हत्ती कुठे पाहिलास?’ तो म्हणाला, ‘सर्कशीत’ यदुनाथजी म्हणाले, ‘त्याला शिंग असतात का?’ तो म्हणाला, ‘नाही.’ ‘मग तू का काढलीस.’ ‘मला वाटलं, हत्तीहून मोठ्या प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला तर वरच्या बाजूला काहीतरी हवं म्हणून मी शिंग काढली.’या त्या बालमनाच्या हत्तीसाठी शुभेच्छाच आहेत़ त्या मुलाचे वाटणे यातच कलेचा जन्म आहे़ एखादे साधे विधान असते, वारा वाहतो आहे पण एखादा म्हणेल, मला वाटतं वारा म्हणजे डोळ्यातले पाणी पुसणारा आजोबा आहे किंवा एखादा म्हणेल, हा वारा म्हणजे अपरात्री फिरणाऱ्या अश्वत्थाम्याचा सखा आहे़ साºया कला या वाटते मध्ये आहेत़ वाटतेचे आभाळ अमर्याद आहे़ म्हणूनच वाटते, एखाद्याला शुभेच्छा देणे ही माणसाची भावनिक गरज असावी़ म्हणजेच संवाद साधणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे़ माध्यमे वेगवेगळी असू शकतात़किमया शुभेच्छा कार्डाची! या सदरामधून आपण माझी महाराष्ट्रभर पोहचलेली शुभेच्छा कार्डे पाहणारा आहात़ या शुभेच्छा पत्रांमधून तुम्हाला एका कलावंताचा तसेच छपाईच्या विकासाचा प्रवास दिसेल़ वाचन तसेच जगण्यातल्या प्रसगांच्या आठवणीमधून ही शुभेच्छा कार्डे साकारली आहेत़ १९९६ साली मी माझ्या मुलीला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते, आपल्या बागेतल्या शेवंतीच्या कळ्या फुलवायला अजून तयार नाहीत़ कारण ढगाळ वातावरण उनच नाही़ उन्हानेच या आनंदविभोर होऊन उमलतील़ म्हणूनच उन्हाशिवाय, चटक्यांशिवाय, सफरिंगशिवाय आयुष्य फुलत नाहीत़ न पेलणारी स्वप्ने पाहिल्याशिवाय काही मिळवता येत नाही़ स्वप्नच नसेल तर मग प्रश्नच नाही. माझी दरवर्षीची शुभेच्छा कार्डे स्वप्नच तर आहेत़ माझी स्वप्ने पाहायला नुसते डोळेच नव्हे, समृद्ध मनही लागणार आहे़ मग आता बघा, किमयाची भावगर्भ शुभेच्छा कार्डे! (क्रमश:)-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव