शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सुखी व आरोग्यमयी जीवन पर्यावरणावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST

जळगाव : पर्यावरण हा मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ सुखी व आरोग्यमयी ...

जळगाव : पर्यावरण हा मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ सुखी व आरोग्यमयी जीवन हे पर्यावरणावर अवलंबून असते. मात्र याबद्दलची जागृती आपल्याकडे अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आता सर्वांनी पर्यावरणाशी जुळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची माहिती युनेस्को इंडिया व जलशक्ती मंत्रालयातर्फे पुरस्कारप्राप्त प्रज्ञा ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रज्ञा ठाकूर या मूळच्या जळगाव शहरातील आहेत. सद्यस्थितीला त्या पुण्यात वास्तव्यास असून पर्यावरण व जलसंवर्धनासाठी काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न : किती वर्षांपासून आपण पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहात?

ठाकूर : जळगावशी माझी जन्मत: नाळ जुळली आहे. गेल्या २७ वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. त्यातील २० वर्षे सामाजिक व पर्यावरण क्षेत्र अशा दृष्टिकोनातून काम करीत आहे. खरे तर पर्यावरण ही एक मूलभूत गरजांपैकी एक घटक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. सुखी जीवनासाठी पर्यावरणाशी जुळणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रश्न : कोणत्या प्रकल्पांवर काम केले?

ठाकूर : बऱ्याच गोष्टी या वागण्यातून, आचरणातून सुधारू शकतो. त्यातून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. ही गरज लक्षात घेता सामाजिक क्षेत्राकडे वळले. पर्यावरण विषयातून मी सामाजिक संस्थांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पाणी, स्वच्छता, घनकचरा या प्रकल्पांवर काम केले़ सांडपाण्याचा पुनर्वापर यावरही काम केले. पंधरा वर्षांपासून स्वच्छता, पाणी, घनकचरा यावर काम सुरू आहे. दरम्यान, काम करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अमेरिका, केनिया, जर्मन तसेच युरोपियन संस्थांसोबत काम करण्याचीही संधी मिळाली.

प्रश्न : प्रकल्पांमध्ये किती महिलांचा सहभाग होता?

ठाकूर : पर्यावरण व जल संवर्धनासाठी तीन प्रकल्प राबविले. त्यामुळे सुमारे दहा हजार महिलांचा सहभाग होता. पाणी वाचवा या विषयावर महिलांना प्रशिक्षण दिले गेले. कारण, पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. नळ किती वेळ सुरू ठेवला तर किती पाणी वाया जाते, याची जाण महिलांना झाली. भांडी धुताना साबण लावत असताना नळ बंद करणे आवश्यक आहे. सुरू ठेवला तर लाखो लिटर पाणी वाया जाते, हेसुध्दा महिलांना कळले.

प्रश्न : कचऱ्याचे प्रमाण वाढले, यासाठी काय केले पाहिजे?

ठाकूर : कचरा व्यवस्थापनासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. याबाबत आम्ही पुण्यात महिलांना याबाबत प्रशिक्षण दिले. नाटिका बसवून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात जनजागृती केली. विदेशात तीन प्रकारच्या कचरापेट्या असतात़ जिथे कचरा असतो, तिथेच त्याचे वर्गीकरण केले जाते. अमेरिकेत चुकीच्या डब्यात कचरा टाकला तर दंड होतो. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे.

२७ वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. प्रत्येक नागरिकाला आता पर्यावरणाशी जुळणे आवश्यक आहे. दुसरीकडे घरात हवा आणि प्रकाश हे खेळते असायला हवे. यामुळे घरातील कुटुंबीयांचे आरोग्य उत्तम असते. त्यामुळे पर्यावरण संर्वधनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे.

- प्रज्ञा ठाकूर