शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेस - राष्ट्रवादीचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखलेले : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 17:13 IST

चाळीसगावच्या कृषि महोत्सवात विरोधकांवर हल्लाबोल

ठळक मुद्देयोजनांची जत्राचा चाळीसगाव तालुक्यातील अडीच लाख लोकसंख्येला फायदावरखेडे - लोंढे धरण दोन वर्षात पुर्ण होईलकडधान्य साठविण्यासाठी खासगी गोडावूनही आरक्षित

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधानभवनाच्या प्रांगणात शेतमाल विक्रीचा बाजार भरवला गेला. १५ वर्षात काँग्रेस - राष्ट्रवादीने शेतक-यांना लुटण्याचे एकमेव काम केले. त्यांचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखले असल्याचा आक्रमक हल्लाबोल करीत कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.चाळीसगाव येथे चार दिवसीय कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा, ४३वे विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे उदघाटन शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्व, उत्तमराव पाटील विचार मंचावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलतांना सदाभाऊ खोत यांनी शासनाचे लोककल्याणकारी निर्णय, योजना उपस्थितांसमोर मांडल्या. कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून ८० टक्के कांदा चाळींना पूर्व संमती देण्यासह ११ एप्रिल पर्यंत आॅनलाईन पद्धतीने शेतक-यांचा हरभरा, तूर खरेदी केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. खरेदी केलेले कडधान्य साठविण्यासाठी खासगी गोडावूनही आरक्षित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.मागच्या कार्यकाळात सिंचन कमी आणि पैसा आडवा, पैसा जिरवा. हाच उद्योग केला गेला. मात्र गेल्या साडे तीन वर्षात सरकारने जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविल्याने १६ हजार गावे टँन्करमुक्त झाली आहेत. त्यांनी कृषि महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करतांनाच राज्यातील हा पथदर्शी उपक्रम असल्याचे गौरवदगारही काढले.वरखेडे - लोंढे धरण दोन वर्षात पुर्ण होईल - गिरीष महाजनवरखेडे - लोंढे धरणाला आघाडी सरकारच्या कार्यकाळात फक्त ३३ कोटी रुपये मिळाले. गेल्या साडे तीन वर्षात या धरणासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. धरणाला नुकतीच केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली आहे. यामुळे बळीराजा सन्मान या केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने ५०० कोटी रुपयांचा सुधारीत आराखडा मंजुर झाला आहे. त्यामुळे २०१९ पूर्वीच हे धरण पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गिरणेवरील सात बलून बंधा-यांचे काम महिन्याभरात सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक असणारा जलआराखडा मंजुर झाला आहे. बलून बंधा-यांमुळे गिरणा बाराही महिने खळाळणार असून चाळीसगाव तालुका दुष्काळमुक्त होईल, असेही महाजन यांनी सांगितले. चाळीसगाव शहरासाठी ७१ कोटीची सुधारीत पाणी पुरवठा मंजुर झाली आहे. भूयारी गटारी योजनेचा प्रस्ताव दाखल करा. यासाठी लागणारे १६० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित हा उपक्रम राज्यासाठी आदर्श आहे. एकाच छताखाली शेतकरी, अधिकारी, मार्गदर्शक, तंत्रज्ञ, विद्यार्थी - शिक्षक आणणे ही अभिनव कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.अडीच लाख लोकसंख्येला फायदा : आमदार उन्मेष पाटीलकृषि महोत्सव, योजनांची जत्रा आणि विज्ञान प्रदर्शनातून चाळीसगाव तालुक्यातील अडीच लाख जनतेला फायदा होणार असल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. १५२ शासकीय योजनांची माहिती, राज्यभरातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, कृषि तंत्रज्ञान, शेतक-यांना मार्गदर्शन, योजनांचे लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत शासन पोहचणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी आदर्श शेतक-यांना यावेळी गौरविण्यात आले.खासदार एस.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ यांचीही भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रा. डॉ. किरण गंगापुरकर यांनी केले. आभार स्मितल बोरसे यांनी मानले.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावSadabhau Khotसदाभाउ खोत Jalgaonजळगाव