शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील सत्ताधाऱ्यांचेच हात बरबटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

चाळीसगाव : नगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर गेल्या साडेचार वर्षात आपण शहर विकासासाठी काहीही ठोसपणे करू शकलो नाही. हे अपयश ...

चाळीसगाव : नगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर गेल्या साडेचार वर्षात आपण शहर विकासासाठी काहीही ठोसपणे करू शकलो नाही. हे अपयश लपविण्यासह शहरवासीयांची दिशाभूल करणारी पत्रपरिषदच भाजपाने चार दिवसांपूर्वी घेतली. शहर विकासाच्या कोणत्याही योजनेत व कामात आम्ही कधीही खोडा घातला नाही. आम्हाला कुणाच्या सत्काराची गरज नाही. शहरवासीयांशी आमची नाळ जुळली. आम्हाला निवडून दिले हाच मोठा सन्मान आहे. सत्ताधाऱ्यांचेच हात बरबटलेले आहेत, असा थेट आरोप गुरुवारी दुपारी शविआने घेतलेल्या पत्रपरिषदेत केला.

पालिकेतील विद्यमान भाजपा सत्ताधाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शविआ विकास कामात बहुमताच्या जोरावर अडथळे निर्माण करते. हा आरोपही धादांत खोटा आहे. याउलट सत्ताधाऱ्यांमध्येच बेबनाव असून त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षांवरही त्यांनी आरोप केले आहे. साडेचार वर्षात दहा मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मुख्याधिकारी टिकत का नाही? या प्रश्नाचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असे आव्हानही शविआने पत्रकार परिषदेत दिले.

शविआ व त्यांच्या विचारसरीच्या नेतृत्वाने चाळीस वर्षाहून अधिक काळ पालिकेत नेतृत्व करताना शहराचा जातीय सलोखा कायम ठेवला. शांतता व बंधुभावाला प्राधान्य दिले. तथापि, भाजपाच्या गत साडेचार वर्षाच्या सत्ताकाळात शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व अवैध धंदे बोकाळले आहेत. चाळीसगाव पालिकेची एक प्रतिमा होती. तिलाही तडे गेले आहेत.

विकासकामे बिनचूक व्हावी. त्यांचा दर्जा चांगला असावा. यासाठी दुरुस्ती सुचवणे म्हणजे कामांना विरोध करणे होत नाही. हे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे उलटा चोर कोतवाल को डाटे, असेच आहे, असा आरोपही शविआने केला.

पत्रपरिषदेला नगरसेवक भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख, रवींद्र चौधरी, सायली जाधव, सविता जाधव, वंदना चौधरी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगरसेवक शाम देशमुख, प्रदीप राजपूत, सदाशिव गवळी आदी उपस्थित होते.

चौकट 1...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचेदेखील राजकारण केले. सर्वानुमते पसंत केलेला पुतळा का बदलविण्यात आला ? याला घृष्णेश्वर पाटील, विजया पवार यांनी विरोध केला होता, असाही आरोप पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील यांनी केला.

आम्हाला शहरवासीयांनी निवडून दिले आहे. त्यांच्याबाबत आमचे दायित्व आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या सत्काराची आम्हाला मुळीच गरज नाही. शहरवासीयांनी आम्हाला निवडून दिले. हाच मोठा सन्मान आहे,असे रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

मी शिक्षिका आहे. काहीतरी सेवा करावी म्हणून पालिकेत निवडून आले. मात्र गत साडेचार वर्षात प्रभागात एकही भरीव काम करता आले नाही. हे माझे दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुजाभाव केला, अशी व्यथा सविता जाधव यांनी मांडली.