शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सुवर्ण अलंकार घडविणारे हस्त कारागीर परतले गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटी या गुणांना कलात्मकतेची जोड देऊन देशभरात सुवर्ण अलंकारांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटी या गुणांना कलात्मकतेची जोड देऊन देशभरात सुवर्ण अलंकारांच्या बाबतीत नावलौकिक मिळविण्यासाठी हातभार लावणारे सुवर्णनगरी जळगावातील बंगाली हस्त कारागीर निर्बंधामुळे आपापल्या गावी परतू लागले आहेत. सध्या जळगावात केवळ १० ते १५ टक्केच कारागीर असून ते देखील परत जाण्याची तयारी करत आहे. त्यामुळे ते कधी परतणार याची चिंता जळगावातील सुवर्ण व्यवसायासमोर निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेन मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. यातून सुवर्ण व्यवसायही सुटलेला नाही. सध्या सुवर्ण व्यवसाय बंद आहे, त्याची चिंता तर आहेच, सोबतच कलाकुसरीचे सुवर्ण अलंकार घडविण्यात ज्यांचा हातखंडा आहे, असे बहुतांश हस्त कारागीर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे ते परतण्याचीही चिंता आहे. यामध्ये बंगाली कारागिरांचा समावेश असून त्यांच्यापुढेही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या शहरात १६० वर्षांपूर्वी एक ग्रॅमची अंगठीही तयार स्वरूपात मिळत नव्हती त्या जळगावच्या सराफा बाजारात हजारो प्रकारच्या अत्याधुनिक फॅशनच्या दागिन्यांची उपलब्धता एक ग्रॅमपासून तर पाहिजे त्या प्रमाणात सहजपणे उपलब्ध करुन देणाऱ्या जळगावच्या सुवर्णनगरीतील अलंकार केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहचत आहे.

सहा हजार कारागिरांचा हातभार

जळगावातील सुवर्ण व्यवसायाने शुद्धतेवर भर दिला असून या शुद्धतेसोबतच आकर्षक कलाकुसरीने ते जगभरात पोहचले आहे. अलंकारांची ही घडण करण्यासाठी बंगाली कारागिरांचे हात रात्रंदिवस राबतात. जळगाव शहरात सहा हजार बंगाली बांधव या व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहे. यात चार हजार हस्त कारागीर आहेत. मात्र कोरोनाच्या धास्तीने बहुतांश कारागीर हे आपापल्या गावी बंगालकडे परतले आहेत. काही जण जळगावात आहेत, मात्र कामच नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून तेदेखील गावी परतण्याच्या तयारीत आहे. आज येथील सुवर्ण व्यावसायिक त्यांना मदत करीत आहे, मात्र कारागीर गावी जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले.

निर्बंधानंतरही चिंता

सध्या जे कारागीर गावी गेले आहे, ते पुन्हा परत येतात की नाही, याची शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात जे येथे आहे तेदेखील गावी जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नंतर सुवर्णपेढ्या सुरू झाल्या तरी कारागिरांशिवाय व्यवसाय हा विचारच शक्य नसल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कारण कोरोनाने सर्वांच्या मनात मोठी धास्ती निर्माण केली असून परप्रांतीय कोणताही कारागीर बाहेर पडण्यापूर्वी विचार करणार असल्याचे कारागिरांच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिक चिंतेत आहे. तसे पाहता जळगावात १२ हजार बंगाली कारागीर होते. मात्र गेल्या वर्षी ते गावी परतले व निम्मे कारागीर जळगावात आलेच नाही. त्यामुळे यंदाही ही चिंता राहणारच आहे.

------------------------

सध्या सुवर्ण पेढ्या बंद आहे. त्याची चिंता तर आहेच, सोबतच सुवर्ण अलंकार घडविणारे कारागीर देखील गावी परतले आहेत. त्यामुळे नंतरही याची चिंता राहणार आहे.

- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन, जळगाव.

--------------------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमुळे अनेक बंगाली कारागीर गावी परतले आहे. आता येथे जे आहेत ते देखील जाण्याची तयारी करीत आहे.

- महेंद्र मायटी, सचिव, बंगाली गोल्ड असोसिएशन, जळगाव.