शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सुवर्ण अलंकार घडविणारे हस्त कारागीर परतले गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटी या गुणांना कलात्मकतेची जोड देऊन देशभरात सुवर्ण अलंकारांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटी या गुणांना कलात्मकतेची जोड देऊन देशभरात सुवर्ण अलंकारांच्या बाबतीत नावलौकिक मिळविण्यासाठी हातभार लावणारे सुवर्णनगरी जळगावातील बंगाली हस्त कारागीर निर्बंधामुळे आपापल्या गावी परतू लागले आहेत. सध्या जळगावात केवळ १० ते १५ टक्केच कारागीर असून ते देखील परत जाण्याची तयारी करत आहे. त्यामुळे ते कधी परतणार याची चिंता जळगावातील सुवर्ण व्यवसायासमोर निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेन मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. यातून सुवर्ण व्यवसायही सुटलेला नाही. सध्या सुवर्ण व्यवसाय बंद आहे, त्याची चिंता तर आहेच, सोबतच कलाकुसरीचे सुवर्ण अलंकार घडविण्यात ज्यांचा हातखंडा आहे, असे बहुतांश हस्त कारागीर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे ते परतण्याचीही चिंता आहे. यामध्ये बंगाली कारागिरांचा समावेश असून त्यांच्यापुढेही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या शहरात १६० वर्षांपूर्वी एक ग्रॅमची अंगठीही तयार स्वरूपात मिळत नव्हती त्या जळगावच्या सराफा बाजारात हजारो प्रकारच्या अत्याधुनिक फॅशनच्या दागिन्यांची उपलब्धता एक ग्रॅमपासून तर पाहिजे त्या प्रमाणात सहजपणे उपलब्ध करुन देणाऱ्या जळगावच्या सुवर्णनगरीतील अलंकार केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहचत आहे.

सहा हजार कारागिरांचा हातभार

जळगावातील सुवर्ण व्यवसायाने शुद्धतेवर भर दिला असून या शुद्धतेसोबतच आकर्षक कलाकुसरीने ते जगभरात पोहचले आहे. अलंकारांची ही घडण करण्यासाठी बंगाली कारागिरांचे हात रात्रंदिवस राबतात. जळगाव शहरात सहा हजार बंगाली बांधव या व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहे. यात चार हजार हस्त कारागीर आहेत. मात्र कोरोनाच्या धास्तीने बहुतांश कारागीर हे आपापल्या गावी बंगालकडे परतले आहेत. काही जण जळगावात आहेत, मात्र कामच नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून तेदेखील गावी परतण्याच्या तयारीत आहे. आज येथील सुवर्ण व्यावसायिक त्यांना मदत करीत आहे, मात्र कारागीर गावी जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले.

निर्बंधानंतरही चिंता

सध्या जे कारागीर गावी गेले आहे, ते पुन्हा परत येतात की नाही, याची शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात जे येथे आहे तेदेखील गावी जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नंतर सुवर्णपेढ्या सुरू झाल्या तरी कारागिरांशिवाय व्यवसाय हा विचारच शक्य नसल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कारण कोरोनाने सर्वांच्या मनात मोठी धास्ती निर्माण केली असून परप्रांतीय कोणताही कारागीर बाहेर पडण्यापूर्वी विचार करणार असल्याचे कारागिरांच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिक चिंतेत आहे. तसे पाहता जळगावात १२ हजार बंगाली कारागीर होते. मात्र गेल्या वर्षी ते गावी परतले व निम्मे कारागीर जळगावात आलेच नाही. त्यामुळे यंदाही ही चिंता राहणारच आहे.

------------------------

सध्या सुवर्ण पेढ्या बंद आहे. त्याची चिंता तर आहेच, सोबतच सुवर्ण अलंकार घडविणारे कारागीर देखील गावी परतले आहेत. त्यामुळे नंतरही याची चिंता राहणार आहे.

- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन, जळगाव.

--------------------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमुळे अनेक बंगाली कारागीर गावी परतले आहे. आता येथे जे आहेत ते देखील जाण्याची तयारी करीत आहे.

- महेंद्र मायटी, सचिव, बंगाली गोल्ड असोसिएशन, जळगाव.