शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

हगणदरीमुक्तीत मनपा पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 00:59 IST

नगरविकास विभागाची नाराजी : मुंबईत घेतला जाणार आढावा

जळगाव : हगणदरीमुक्तीत मनपाकडून अद्याप समाधानकारक कामगिरी नसल्याने मनपाच्या कामकाजावर नगर विकास विभागाने नाराजी व्यक्त केली असून कामांना गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात १ मार्च रोजी मुंबईत आढावा बैठकही घेतली जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत अभियान तसेच हगणदरी मुक्तीसाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. मात्र त्यात अद्यापही फारशी प्रगती नाही. या संदर्भातील अहवाल पाहिल्यानंतर नगर विकास विभागानेही नाराजी व्यक्त केली आहे. या विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांचे पत्र मनपास प्राप्त झाले आहे. हगणदरी मुक्तीची प्रगती असमाधानकारक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे उद्दीष्ट ३१ मार्च २०१७ पूर्वी पूर्ण करून शहर हगणदरी मुक्त करावे असे आदेशही या पत्रात देण्यात आले असून १ मार्च रोजी मुंबईत आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. या बैठकीत हगणदरीमुक्तीचा अहवाल सादर करावा लागणार  आहे. वैयक्तिक शौचालयांवर भरहगणदरी मुक्तीचा एक भाग म्हणून शहरात गरीब वस्त्यांमध्ये वैयक्तीक शौचालय उभारणी केली जात आहे. यासाठी मनपाकडे ५६३६ अर्ज प्राप्त झाले होते. शौचालय बांधण्यासाठी लाभधारकास १२ हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाकडून त्यासाठी ५ कोटी ६२ लाखाचे अनुदानही प्राप्त झाले आहे. यात काहींना अनुदानाचा पहिला तर अनेकांना दुसरा हप्ताही वितरीत झाला आहे. १७८७ नागरिकांनी अनुदान घेऊन अद्यापही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. तर ११३० जणांचे बांधकाम सुरू झाले आहे. अनुदानातून शहरात आतापर्यंत २७१९ जणांची शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. अर्ज आलेल्या ५६३६ नागरिकांना मनपाने शौचालय उभारणीसाठीचा पहिला सहा हजाराचा हप्ता म्हणजे ३ कोटी ३८ लाख १६ हजाराचे अनुदान वितरीत केले आहे.