शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

जळगावात भारनियमनामुळे दालफडमधील उत्पादन निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 22:28 IST

जोरदार फटका: कामगारांवर बेरोजगाराची वेळ

ठळक मुद्दे40 लाकडी वखारींवरही संकटउलाढाल ठप्पउत्पादन खर्च वाढल्याने आर्थिक भूर्दंड 

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - गेल्या 40 वर्षापासून डाळ तयार करण्यासह कडधान्याला पॉलिश करणा:या जळगावातील दालफड उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत असून येथील उत्पादन निम्म्यावर आले आहे. इतकेच नव्हे 200हून अधिक कामगारांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. या सोबतच 40 लाकडाच्या वखारींनादेखील याची झळ पोहचत आहे. शहरातील शिवाजीनगरमध्ये नवीन हुडको भाग, भुरे मामलेदार प्लॉट या भागांमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून दालफड सुरू आहे. दालफड व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांमार्फत चालविण्या:या या उद्योगामध्ये डाळ तयार करण्यासह मठ, उडीद, मूग यांना पॉलिश करण्याचे काम केले जाते. मात्र गेल्या दोन अडीच महिन्यांपासून या उद्योगाला वेगळ्य़ावेगळ्य़ा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  

9 तास भारनियमनामुळे फटका1 जुलै पासून लागू झालेल्या वस्तू व सेवा करामुळे  (जीएसटी) दालफड व्यापारी हैराण झाले. त्यानंतर यातून कसेबसे सावरत नाही तोच आता गेल्या 10 दिवसांपासून  या उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत आहे. शिवाजीनगर येथे दररोज सकाळी साडेचार तास व दुपारी अथवा संध्याकाळी साडेचार तास भारनियमन केले जात आहे. दिवसभरातील नऊ तासाच्या भारनियमनामुळे हा उद्योग कोलमडला असून व्यापारी चिंतातूर झाले आहेत.  पॉलिश होईनादालफडमध्ये दररोज 50टन डाळीचे उत्पादन केले जाते. मात्र सध्या मालाची आवक नसल्याने तसेच पावसाळी वातावरणामुळे डाळ वाळत नाही म्हणून येथे डाळीचे उत्पादन नसते. पॉलिशचे काम या दिवसात केले जाते. त्यानुसार दररोज 100 टन मालाला पॉलिश केली जाते. मात्र भारनियमनामुळे हे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. सध्या 50 टनमालदेखील तयार होत नसल्याचे येथील व्यापा:यांनी सांगितले. 

दालमिलमध्ये जवळपास 200 कामगार आहे. मात्र भारनियमनामुळे उत्पादन बंद असले तरी उद्योजकांना मजुरी मोजावीच लागत आहे आणि मालाचे उत्पादन मात्र कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे  वस्तूंवरील उत्पादन खर्च वाढला आहे तर दुसरीकडे पाहिजे तसा भाव मालाला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. 

दालफडमधून शहरातील व्यापारी केंद्र असलेल्या दाणाबाजारात दररोज डाळी व इतर धान्याची दररोज मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. मात्र भारनियमनामुळे शार्टेक्स मशिनदेखील चालविता येत नसल्याने उलाढाल जवळपास ठप्प झाली आहे.     दालफडसोबतच या भागातील लाकूडपेठ, शिवाजीनगर येथे 40 लाकडी वखारी आहेत. त्यांनाही या भारनियमनाचा फटका बसून तेथील उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

बेरोजगारी वाढण्याची भीतीवर्षभर चालणा:या दालफड व लाकडी वखारी येथे सध्या भारनियमनामुळे काम होत नसल्याने कामगार हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे दालफडमधील 200 तर वखारींमधील 175 कामगारांनादेखील झळ बसू शकते. त्यामुळे 375 कामगारांवर बेरोजगारीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात केवळ शनिवारी भारनियमन केले जाते. त्याच धर्तीवर शिवाजीनगर भागात वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी दालफड व्यापारी असोसिएशनच्यावतीने वीज वितरण कंपनीकडे केली आहे. 

आधीच जीएसटीमुळे उद्योजक हैराण असून आता भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. उत्पादन निम्म्यावर आले असून येथे आठवडय़ातून एकच दिवस भारनियमन करण्यात यावे अथवा त्याचे प्रमाण कमी करण्यात यावे. - गोपाल व्यास, अध्यक्ष, दालफड व्यापारी असोसिएशन, जळगाव.