शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जळगावात भारनियमनामुळे दालफडमधील उत्पादन निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 22:28 IST

जोरदार फटका: कामगारांवर बेरोजगाराची वेळ

ठळक मुद्दे40 लाकडी वखारींवरही संकटउलाढाल ठप्पउत्पादन खर्च वाढल्याने आर्थिक भूर्दंड 

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - गेल्या 40 वर्षापासून डाळ तयार करण्यासह कडधान्याला पॉलिश करणा:या जळगावातील दालफड उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत असून येथील उत्पादन निम्म्यावर आले आहे. इतकेच नव्हे 200हून अधिक कामगारांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. या सोबतच 40 लाकडाच्या वखारींनादेखील याची झळ पोहचत आहे. शहरातील शिवाजीनगरमध्ये नवीन हुडको भाग, भुरे मामलेदार प्लॉट या भागांमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून दालफड सुरू आहे. दालफड व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांमार्फत चालविण्या:या या उद्योगामध्ये डाळ तयार करण्यासह मठ, उडीद, मूग यांना पॉलिश करण्याचे काम केले जाते. मात्र गेल्या दोन अडीच महिन्यांपासून या उद्योगाला वेगळ्य़ावेगळ्य़ा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  

9 तास भारनियमनामुळे फटका1 जुलै पासून लागू झालेल्या वस्तू व सेवा करामुळे  (जीएसटी) दालफड व्यापारी हैराण झाले. त्यानंतर यातून कसेबसे सावरत नाही तोच आता गेल्या 10 दिवसांपासून  या उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत आहे. शिवाजीनगर येथे दररोज सकाळी साडेचार तास व दुपारी अथवा संध्याकाळी साडेचार तास भारनियमन केले जात आहे. दिवसभरातील नऊ तासाच्या भारनियमनामुळे हा उद्योग कोलमडला असून व्यापारी चिंतातूर झाले आहेत.  पॉलिश होईनादालफडमध्ये दररोज 50टन डाळीचे उत्पादन केले जाते. मात्र सध्या मालाची आवक नसल्याने तसेच पावसाळी वातावरणामुळे डाळ वाळत नाही म्हणून येथे डाळीचे उत्पादन नसते. पॉलिशचे काम या दिवसात केले जाते. त्यानुसार दररोज 100 टन मालाला पॉलिश केली जाते. मात्र भारनियमनामुळे हे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. सध्या 50 टनमालदेखील तयार होत नसल्याचे येथील व्यापा:यांनी सांगितले. 

दालमिलमध्ये जवळपास 200 कामगार आहे. मात्र भारनियमनामुळे उत्पादन बंद असले तरी उद्योजकांना मजुरी मोजावीच लागत आहे आणि मालाचे उत्पादन मात्र कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे  वस्तूंवरील उत्पादन खर्च वाढला आहे तर दुसरीकडे पाहिजे तसा भाव मालाला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. 

दालफडमधून शहरातील व्यापारी केंद्र असलेल्या दाणाबाजारात दररोज डाळी व इतर धान्याची दररोज मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. मात्र भारनियमनामुळे शार्टेक्स मशिनदेखील चालविता येत नसल्याने उलाढाल जवळपास ठप्प झाली आहे.     दालफडसोबतच या भागातील लाकूडपेठ, शिवाजीनगर येथे 40 लाकडी वखारी आहेत. त्यांनाही या भारनियमनाचा फटका बसून तेथील उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

बेरोजगारी वाढण्याची भीतीवर्षभर चालणा:या दालफड व लाकडी वखारी येथे सध्या भारनियमनामुळे काम होत नसल्याने कामगार हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे दालफडमधील 200 तर वखारींमधील 175 कामगारांनादेखील झळ बसू शकते. त्यामुळे 375 कामगारांवर बेरोजगारीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात केवळ शनिवारी भारनियमन केले जाते. त्याच धर्तीवर शिवाजीनगर भागात वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी दालफड व्यापारी असोसिएशनच्यावतीने वीज वितरण कंपनीकडे केली आहे. 

आधीच जीएसटीमुळे उद्योजक हैराण असून आता भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. उत्पादन निम्म्यावर आले असून येथे आठवडय़ातून एकच दिवस भारनियमन करण्यात यावे अथवा त्याचे प्रमाण कमी करण्यात यावे. - गोपाल व्यास, अध्यक्ष, दालफड व्यापारी असोसिएशन, जळगाव.