शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

निम्मा जळगाव जिल्हा दुष्काळी, 8 तालुक्यातील 814 गावे 50 पैशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:58 IST

7 तालुके पूर्ण दुष्काळी

ठळक मुद्देपारोळ्याचा अपवाद7 तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी 50च्या वर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16- जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून 15 तालुक्यातील एकूण 1502 गावांपैकी 8 तालुक्यातील 814 गावांची पैसेवारी 50पैशांच्या आत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात 7 तालुक्यांची पूर्णपणे पैसेवारी 50 टक्कय़ांच्या आत असून केवळ पारोळा तालुक्यातील काही गावे 50 पैशांच्या आत आहेत. तर 688 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. त्यामुळे 50पैशांच्या आत पैसेवारी असलेला निम्म्याहून अधिक जिल्हा दुष्काळी जाहीर होणार असून त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. काही तालुक्यात बरा पाऊस झाला तरी परिस्थिती बिकट असल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत होती. मात्र नियमानुसार पैसेवारीच्या  आकडेवारीवरूनच दुष्काळ जाहीर करता येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे अंतीम पैसेवारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार शुक्रवारी अंतीम पैसेवारी जाहीर झाली. त्यात जिल्ह्यातील 1502 गावांपैकी 814 गावांची पैसेवारी 50च्या आत असून 688 गावांची पैसेवारी 50च्या वर  आहे. 7 तालुके पूर्ण दुष्काळी15 पैकी 7 तालुक्यांमधील सर्व गावांची पैसेवारी 50च्या आत असल्याने हे संपूर्ण तालुकेच दुष्काळी ठरले आहेत. त्यात जामनेर (152 गावे), बोदवड (51), मुक्ताईनगर (81), पाचोरा (129), भडगाव (63),अमळनेर (154), चाळीसगाव (136 गावे) या तालुक्यांचा समावेश आहे.7 तालुक्यांची पैसेवारी 50च्या वर7 तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. त्यात  जळगाव (92 गावे), एरंडोल (65 गावे), धरणगाव (89 गावे), भुसावळ (54 गावे), यावल (84 गावे), रावेर (121 गावे), चोपडा (117 गावे) या तालुक्यांचा समावेश आहे. पारोळ्याचा अपवादपारोळा तालुक्यातील 114 पैकी 48 गावांची पैसेवारी 50च्या आत असून 66 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे.