शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

क्वाॅरंटाइन नागरिकांच्या मतदानासाठी अर्ध्या तासाचा ठेवला राखीव वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात आहे. कोरोनाबाधितांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कोविडबाधित, विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येणार आहे.

जिल्ह्यात ७८२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यामध्ये जे कोरोनाबाधित आहे, ते मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्यासाठीही वेळ राखीव ठे‌वण्यात आला आहे.

सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे मतदान करता येईल.

क्वाॅरंटाइनसाठी मतदानाची वेळ राखीव

एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असून, त्यांना आता हक्क बजावता येणार आहे.

मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था

जिल्ह्यातील बाधितांची संख्या व माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाइज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनेदेखील दक्षता घेण्यात येईल. मतदारांच्या शरीराच्या तापमानाची तपासणीदेखील केली जाईल.

मास्क असताना ओळख पटणार?

मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. मात्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी राहणार असून येताना, जाताना, मतदान करताना मास्क प्रत्येकाला वापरावाच लागेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने संपूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. क्वाॅरंटाइन नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शेवटचा अर्धा तास त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले असून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

-नामदेव पाटील, तहसीलदार