शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

क्वाॅरंटाइन नागरिकांच्या मतदानासाठी अर्ध्या तासाचा ठेवला राखीव वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात आहे. कोरोनाबाधितांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कोविडबाधित, विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येणार आहे.

जिल्ह्यात ७८२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यामध्ये जे कोरोनाबाधित आहे, ते मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्यासाठीही वेळ राखीव ठे‌वण्यात आला आहे.

सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे मतदान करता येईल.

क्वाॅरंटाइनसाठी मतदानाची वेळ राखीव

एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असून, त्यांना आता हक्क बजावता येणार आहे.

मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था

जिल्ह्यातील बाधितांची संख्या व माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाइज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनेदेखील दक्षता घेण्यात येईल. मतदारांच्या शरीराच्या तापमानाची तपासणीदेखील केली जाईल.

मास्क असताना ओळख पटणार?

मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. मात्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी राहणार असून येताना, जाताना, मतदान करताना मास्क प्रत्येकाला वापरावाच लागेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने संपूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. क्वाॅरंटाइन नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शेवटचा अर्धा तास त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले असून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

-नामदेव पाटील, तहसीलदार