शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

क्वाॅरंटाइन नागरिकांच्या मतदानासाठी अर्ध्या तासाचा ठेवला राखीव वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात आहे. कोरोनाबाधितांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कोविडबाधित, विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येणार आहे.

जिल्ह्यात ७८२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यामध्ये जे कोरोनाबाधित आहे, ते मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्यासाठीही वेळ राखीव ठे‌वण्यात आला आहे.

सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे मतदान करता येईल.

क्वाॅरंटाइनसाठी मतदानाची वेळ राखीव

एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असून, त्यांना आता हक्क बजावता येणार आहे.

मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था

जिल्ह्यातील बाधितांची संख्या व माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाइज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनेदेखील दक्षता घेण्यात येईल. मतदारांच्या शरीराच्या तापमानाची तपासणीदेखील केली जाईल.

मास्क असताना ओळख पटणार?

मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. मात्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी राहणार असून येताना, जाताना, मतदान करताना मास्क प्रत्येकाला वापरावाच लागेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने संपूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. क्वाॅरंटाइन नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शेवटचा अर्धा तास त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले असून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

-नामदेव पाटील, तहसीलदार