शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे निम्म्या शहरातील बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून टप्प्या-टप्प्याने पाच ते सहा तासांनी वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

रविवारी पहाटे पावसाने विजांच्या गडगडाटासह जळगाव शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसासोबत जोरदार वाराही असल्यामुळे अनेक भागातले ब्रेक डाऊन होऊन वीज पुरवठा खंडित झाला. यामध्ये महाबळ, सुप्रिम कॉलनी, मेहरुण, अयोध्या नगर, पिंप्राळा, गणेश कॉलनी, शिवाजी नगर, जय नगर, नवीपेठ यासह शहराच्या इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक भागात पाऊस सुरू असताना अधून-मधून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता.

इन्फो :

टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत

अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे एकाच वेळेस शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, तत्काळ वीज पुरवठा सुरू करणे महावितरणला अशक्य होते. ब्रेक डाऊनमुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, जळगाव शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांनी तत्काळ सर्व शाखा अभियंत्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. या पावसामुळे शहरात कुठेही विद्युत खांब किंवा विद्युत तारा कोसळण्याची घटना घडली नसली तरी, पाच ते सहा ठिकाणी ब्रेक डाऊन झाल्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी इन्सुलेटर तुटून पडले. त्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने शहरातील विविध भागातील वीज पुरवठा पाच ते सहा तासानंतर सुरळीत केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

कमी दाबाने वीज पुरवठा

शहरातील जय नगरमध्ये पहाटे ४ वाजता वीज पुरवठा खंडित होऊन, सकाळी सात वीज पुरवठा सुरू झाला. मात्र, अत्यंत कमी दाबाने विजेचा प्रवाह असल्यामुळे घरातील इतर उपकरणे नागरिकांना बंद ठेवावी लागली. याबाबत काही नागरिकांनी स्थानिक महावितरणच्या कार्यालयात तक्रार करूनही सकाळी ११ पर्यंतही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. तसेच कार्यालयातील फोनही घेण्यात येत नसल्याने, नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.