शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अवकाळी पावसामुळे निम्म्या शहरातील बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून टप्प्या-टप्प्याने पाच ते सहा तासांनी वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

रविवारी पहाटे पावसाने विजांच्या गडगडाटासह जळगाव शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसासोबत जोरदार वाराही असल्यामुळे अनेक भागातले ब्रेक डाऊन होऊन वीज पुरवठा खंडित झाला. यामध्ये महाबळ, सुप्रिम कॉलनी, मेहरुण, अयोध्या नगर, पिंप्राळा, गणेश कॉलनी, शिवाजी नगर, जय नगर, नवीपेठ यासह शहराच्या इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक भागात पाऊस सुरू असताना अधून-मधून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता.

इन्फो :

टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत

अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे एकाच वेळेस शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, तत्काळ वीज पुरवठा सुरू करणे महावितरणला अशक्य होते. ब्रेक डाऊनमुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, जळगाव शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांनी तत्काळ सर्व शाखा अभियंत्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. या पावसामुळे शहरात कुठेही विद्युत खांब किंवा विद्युत तारा कोसळण्याची घटना घडली नसली तरी, पाच ते सहा ठिकाणी ब्रेक डाऊन झाल्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी इन्सुलेटर तुटून पडले. त्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने शहरातील विविध भागातील वीज पुरवठा पाच ते सहा तासानंतर सुरळीत केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

कमी दाबाने वीज पुरवठा

शहरातील जय नगरमध्ये पहाटे ४ वाजता वीज पुरवठा खंडित होऊन, सकाळी सात वीज पुरवठा सुरू झाला. मात्र, अत्यंत कमी दाबाने विजेचा प्रवाह असल्यामुळे घरातील इतर उपकरणे नागरिकांना बंद ठेवावी लागली. याबाबत काही नागरिकांनी स्थानिक महावितरणच्या कार्यालयात तक्रार करूनही सकाळी ११ पर्यंतही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. तसेच कार्यालयातील फोनही घेण्यात येत नसल्याने, नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.