शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अवकाळी पावसामुळे निम्म्या शहरातील बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून टप्प्या-टप्प्याने पाच ते सहा तासांनी वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

रविवारी पहाटे पावसाने विजांच्या गडगडाटासह जळगाव शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसासोबत जोरदार वाराही असल्यामुळे अनेक भागातले ब्रेक डाऊन होऊन वीज पुरवठा खंडित झाला. यामध्ये महाबळ, सुप्रिम कॉलनी, मेहरुण, अयोध्या नगर, पिंप्राळा, गणेश कॉलनी, शिवाजी नगर, जय नगर, नवीपेठ यासह शहराच्या इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक भागात पाऊस सुरू असताना अधून-मधून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता.

इन्फो :

टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत

अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे एकाच वेळेस शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, तत्काळ वीज पुरवठा सुरू करणे महावितरणला अशक्य होते. ब्रेक डाऊनमुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, जळगाव शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांनी तत्काळ सर्व शाखा अभियंत्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. या पावसामुळे शहरात कुठेही विद्युत खांब किंवा विद्युत तारा कोसळण्याची घटना घडली नसली तरी, पाच ते सहा ठिकाणी ब्रेक डाऊन झाल्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी इन्सुलेटर तुटून पडले. त्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने शहरातील विविध भागातील वीज पुरवठा पाच ते सहा तासानंतर सुरळीत केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

कमी दाबाने वीज पुरवठा

शहरातील जय नगरमध्ये पहाटे ४ वाजता वीज पुरवठा खंडित होऊन, सकाळी सात वीज पुरवठा सुरू झाला. मात्र, अत्यंत कमी दाबाने विजेचा प्रवाह असल्यामुळे घरातील इतर उपकरणे नागरिकांना बंद ठेवावी लागली. याबाबत काही नागरिकांनी स्थानिक महावितरणच्या कार्यालयात तक्रार करूनही सकाळी ११ पर्यंतही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. तसेच कार्यालयातील फोनही घेण्यात येत नसल्याने, नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.