शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बोदवड जि.प.शाळांमधील शिक्षकांचे वर्गणी करुन ‘ज्ञानदीप अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 12:44 IST

शिक्षक घेताहेत ‘शोध नैपुण्याचा’

ठळक मुद्देशिक्षकांनीच स्वत:च अभ्यासक्रम तयार केलामाफक दरात पुस्तके उपलब्ध दिली करूनस्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या द्ृष्टीने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी सांगड

चुडामण बोरसेजळगाव - ज्ञान दिल्याने ज्ञान हे वाढत असते... हे ब्रीद घेऊन बोदवड (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी  स्वयंस्फूर्तीने ‘शोध नैपुण्याचा’ हा  अभिनव उपक्रम सुरु केला  आहे. यासाठी  शिक्षकांनी वर्गणी गोळा करुन दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे.  चांगला विद्यार्थी आणि चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षक काय करु शकतात, याचे एक आदर्श उदाहरण बोदवडच्या शिक्षकांनी उभे केले आहे.   आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. भविष्यात आपला  विद्यार्थी या आव्हानाला यशस्वीपणे सामोरा जावा आणि मुख्य म्हणजे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि या परीक्षांची तयारी इयत्ता पहिलीपासून व्हावी, यासाठी  हे अभियान सुरु करण्यात आले आहे.   ‘ज्ञानदीप अभियान’ असे या अभियानाचे  नाव देण्यात आले  आहे.   आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व क्षमता याची शिक्षकांना माहिती असते.  यासाठी शिक्षकांनीच स्वत:च अभ्यासक्रम  तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या द्ृष्टीने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी सांगड घालून या ज्ञानरचनावादी पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.असे आहे अभियानया अभियानात बोदवड तालुक्यातील सर्व जि.प. शाळा शाळांमधील  इ.१ ली ते इ.७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा  घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्वत:चा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. सर्व शाळांमधून अधिकाधिक विद्यार्थी ही परीक्षा देऊ  शकतील, यासाठी अतिशय माफक दरात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी गरज पडल्यास शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे.अभियानाची वैशिष्ट्येइयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टॅलेंट सर्च,  आॅलिंपियाड,  ब्रेन डेव्हलपमेंट यासारख्या परीक्षांचा सराव पहिलीच्या वर्गापासूनच व्हावा, यासाठी या शिक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत.  आजकाल  कर्मचारी  ते जिल्हाधिकारी पदापर्यंतची निवड ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते. ग्रामीण भागातील शाळांमधील मुलांना ही संधी मिळावी आणि  शिक्षकांचाही गुणवत्ता विकास व्हावा, यासाठी शिक्षकांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे.