शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शासनाच्या जाचक अटींविरोधात ‘गुरुजीं’चा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 19:39 IST

शाळास्तरावर शिक्षकांना देण्यात आलेली आॅनलाईन कामे, बदली प्रक्रियेतील जाचक नियमासह विविध शासननिर्णयाविरोधात शनिवारी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार जिल्हापरिषदेच्याप्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाची झोप उडवून दिली.

ठळक मुद्देशिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा २४ शिक्षक संघटनांचा सहभागमोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिका

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.४-शाळास्तरावर शिक्षकांना देण्यात आलेली आॅनलाईन कामे, बदली प्रक्रियेतील जाचक नियमासह विविध शासननिर्णयाविरोधात शनिवारी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार जिल्हापरिषदेच्याप्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाची झोप उडवून दिली.  शिस्तबध्दरित्यावकोणत्याही घोषणा न देता काढलेल्या या विराट मोर्चाव्दारे शिक्षकांवर शासनाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटींविरोधात जिल्'ातील २४ शिक्षक संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या.4 शिक्षिकांच्या पंचमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

शिक्षक बदली विषयक २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शिक्षक बदली विषयक  शासन निर्णयात अन्यायकारक बाबी बदलण्यात याव्यात, शिक्षकांवर थोपण्यात आलेल्या आॅनलाईन कामांसाठी शाळास्तरावर डेटा आॅपरेटरची नियुक्ती करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी ४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून घेण्यात आला होता. त्यांच्या निर्णयाला राज्यभरातील शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिल्यानंतर शनिवारी जळगावात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्'ातील सुमारे ५ हजार शिक्षक सहभागी झाले.

मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिकामोर्चाला सुरुवात करण्यात आधी आॅनलाईन जाचाला कंटाळून आत्महत्या करणारे चाळीसगाव तालुक्यातील देशमुखवाडी जि.प.शाळेतील शिक्षक आबासाहेब चौधरी (रा.पिंपळगावम्हाळसा)यांना श्रध्दांजली देण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिका, त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक, तरुण शिक्षक व सर्वात शेवटी जिल्हा शिक्षक समन्वयक समितीचे सदस्य अशाप्रकारे मोर्चाची रचना करण्यात आली. दुपारी १.३० वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानातून मोर्चाला सुरुवात झाली तर दुपारी २.४० वाजता हामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.  तब्बल एक तास चाललेल्या या मोर्चात शिक्षकांनी शिस्तीचे दर्शन घडविले. शिक्षकांनी टोप्या घालून त्यावर आपल्या मागण्या लिहिलेल्या होत्या. तर विविध फलकांवर देण्यात आलेल्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

महिलांच्या पंचमंडळाने दिले निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी पाकीजा पटेल, संगीता मगर, विद्यादेवी पाटील, छाया सोनवणे, अफशातरन्नुम खान या महिला शिक्षिकांच्या पंचमंडळाने जिल्हाधिकारी  किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले. यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे देखील उपस्थित होते.

अशा होत्या मागण्या १. शिक्षकांकडे दिलेली आॅनलाईनची कामे बंद करा व केंद्रस्तरावर डेटा आॅपरेटरची नेमणूक करण्यात यावी.२. २७ फेब्रुवारी २०१७ रोजीचा शिक्षक बदलीविषयक शासन निर्णयातील अन्यायकारक बाबींची दुरुस्ती करण्यात यावी.३. २३ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या निवड-वरिष्ठ श्रेणीबाबतच्या अन्यायकारक अटी रद्द करा.४ . १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करा.५.संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदतीत वाढ देण्यात यावी.६.शालेय पोषण आहारासह अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा व शिक्षकांना फक्त शिकवू द्या.