बर्हाणपूर : मुसळधार पावसामुळे गुरुद्वाराची विशालकाय भिंत लगतच्या झोपडपट्टीतील चार घरांवर कोसळली. त्या खाली दाबले जाऊन सात चिमुकल्यांचा बळी गेला. नऊ जण गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास दौलतपुरा भागात घडली. या घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने मयतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५0 व जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये १४ वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनाग्रस्त वस्तीत कामगारांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. वस्तीतील अलताफ हा इंदूर येथे रंगकाम करतो. त्यांची जैनब (१५) व मोसीन (१३ ) ही दोन मुले मरण पावली.
----------
नूजहक हफीज (३0), रजिया अलताब (४२), शबनम सत्तार (३0), आयेशा सद्दाम (२), शेख रफिक शेख रसूल (६२), सद्दाम रफिक (२६), आरीफखान सिराजखान (२६), रुखसार सिराज (१६), अलताब शेख नजीर (५0). जैनब अलताब (१५), उस्मान आफताब (११), मोहसीन अलताब (१३), आसमा हाफिज (२), मनतीषा हाफीज (१), शनीसा सद्दाम (४ महिने), आफरीन आरीफ (६ महिने)