शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जळगावात शंभर रुपयांसाठी शस्त्रधारी गुंडांचा घरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:36 IST

फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्दे आयोध्या नगरात थरारदोन तरुण गंभीर जखमीपोलिसांकडून धरपकड सुरु

आॅनलाईन लोकमत

जळगाव दि,२७ :  फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ललित चौधरी या तरुणाने  एका फायनान्सच्या माध्यमातून मोबाईल घेतला होता. त्याचा हप्ता एक हजार ७०० रुपये होता. हा हप्ता घेण्यासाठी प्रविण चंद्रकांत वाघ हा आला असता ललित याने दुपारी एक हजार सहाशे रुपये दिले व त्यातील शंभर रुपये बाकी ठेवले होते. त्यामुळे या कर्मचाºयाचा ललित याच्याशी वाद झाला. त्यानंतर प्रविण वाघ हा रवी भोई, धनराज कोळी, आबु भालेराव, मोनुसिंग बावरी, संदीप वारुळे, शुभम सपकाळे,  दर्शनसिंग टाक, किरण गव्हाणे, प्रेमसिंग टाक, अविनाा नन्नवरे, अश्विन सोनवणे, निखिल बडगुजर व भैय्या भोई यांच्यासह ८ ते १० जण घेऊन सायंकाळी ललित याच्या घरी आला. या टोळक्याने  थेट कुटुंबावर हल्ला चढविला. ही गर्दी पाहून मदतीला धावून आलेल्या अभिषेक व राकेश या दोघांवर जमावातील टोळक्याने तलवार हल्ला केला तर ललित याची बहिण पल्लवी कांचन येवले,  दक्ष येवले (वय ५), स्वरा (२) व पत्नी भूमिका आदींनाही दुखापत झाली.एकाचा प्रकृती चिंताजनकया हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे तर राकेश याच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.घरातील सामानाची नासधूसया टोळक्याने घरातील सामानाची नासधूस केली असून घराच्या खिडक्या, कुलर, पलंग, पाण्याचा इलेक्ट्रीक पंप व सायकलची तोडफोड केली आहे. या टोळक्याच्या दहशतीमुळे कुटुंब भयभीत झाले आहे. 

अन् मोठी दुर्घटना टळलीघटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, विजय नेरकर व किशोर पाटील यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. पोलीस आल्याचे पाहून टोळक्याने तेथून पळ काढला. दरम्यान, पोलीस पोहचले नसते तर एखाद्याचा खूनच झाला असता असे गल्लीतील लोकांनी सांगितले.  पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केल्यानंतर मुख्य आरोपी प्रविण हा हाती लागला. अन्य संशयितांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. दरम्यान, याप्रकरणी संगिता विकास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.