शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

पालकमंत्र्यांनी ‘पालक’ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:14 IST

विकास पाटीलजळगाव शहराच्या विकासासाठी राजकारण करणार नाही तसेच गाळेधारकांनी निर्धास्त रहावे असे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच अमृत योजनेच्या शुभारंभप्रसंगी आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर खरीप व पाणी टंचाईच्या आढावासाठी ते जळगावात येवून गेले. यावेळीही त्यांनी गाळेधारकांना मदतीचे आश्वासन दिले तसेच कपाशीच्या देशी वाणावरील किंमतीचे बंधन ...

विकास पाटीलजळगाव शहराच्या विकासासाठी राजकारण करणार नाही तसेच गाळेधारकांनी निर्धास्त रहावे असे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच अमृत योजनेच्या शुभारंभप्रसंगी आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर खरीप व पाणी टंचाईच्या आढावासाठी ते जळगावात येवून गेले. यावेळीही त्यांनी गाळेधारकांना मदतीचे आश्वासन दिले तसेच कपाशीच्या देशी वाणावरील किंमतीचे बंधन उठविण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. २० दिवसातील या तीनही आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व गाळेधारक नाराज झाले आहेत.पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालक झाले पाहिजे. जिल्हा व शासन यांच्यातील दुवा बनून जिल्ह्याचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावावे या हेतूनेच पालकमंत्री व पालक सचिव ही दोन्ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्याचे दुदैव आहे की या दोन्ही पदांकडून जिल्हावासीयांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.जळगाव शहरातील गाळेधारकांची आश्वासनावर बोळवण सुरु आहे. धक्कादायक म्हणजे एक दिवस आधी पालकमंत्री म्हणतात अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याकडून गाळेधारकांच्या प्रश्नावर अभ्यास सुरु असून लवकरच दिलासा मिळेल अन् दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेला नगर विकास विभागाकडून गाळेप्रश्नी शासनस्तरावर कोणताही अडसर नाही. पुढील कार्यवाही करावी, असे आदेश धडकतात. शासनाच्या या आदेशाने गाळेधारकांची घोर निराशा झाली आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी काय अहवाल दिला, त्याबाबत कोणतीही माहिती गाळेधारकांना विश्वासात घेवून देण्यात आली नाही. थेट कार्यवाहीचे आदेशच मनपात धडकले. गाळेधारकांना दिलासा द्यायचा नव्हता तर निर्धास्त राहण्याचे आश्वासन कशासाठी दिले? असा सूर आता गाळेधारकांमधून उमटत आहे.केवळ गाळेप्रश्नच नव्हे तर हुडको कर्ज फेड, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटीतील १८ कोटीचा नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेला प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ तीन वेळा बदलण्यात आला. त्यानंतर तो २३ मार्चपासून मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे, महिना होत आला तर तो मंजूर झालेला नाही. महामार्गावर निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. असे असतानाही हा डीपीआर मंजुरीसाठी पालकमंत्री प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही. त्यांनी आपले वजन वापरले असते तर कदाचित समांतर रस्त्यांचा व तरसोद ते चिखली दरम्यानच्या चौपदरीकरणास आतापर्यंत प्रारंभ झाला असता. ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची तळमळ दिसते तशी जळगावसाठी दिसत नाही. केवळ महोत्सव, उत्सव, भूमिपूजन, कार्यालयांचे उद्घाटनांसाठी त्यांचा दौरा असू नये. शासन दरबारी जिल्ह्याचे रखडलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावावे व खरोखर जळगावकरांचे पालक व्हावे, अशी जिल्हावासीयांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव