शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शेंदुर्णी गावाला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:23 IST

नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार : जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांवर भटकंतीची वेळ

शेंदूर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सोयगाव तालुक्यातील धरणात पाणी असूनदेखील पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेंदुर्णी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील अंधारी येथे पाण्याची समस्या मोठी बिकट झाली आहे.सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी जलसंपदामंत्री यांनी आमच्या धरणाची उंची वाढवून द्यावी व शेंदुर्णीला लागणारे पाणी तुम्ही नेऊ शकतात असे सर्व राजकीय पक्ष व नागरिक खुल्या मनाने मान्य करतात परंतु महाराष्ट्रातील जलसंपदा सर्वोच्च खातं जामनेर तालुक्याच्या वाट्याला येऊनदेखील शेंदुर्णी व परिसरात नवीन धरण नाही अथवा एकही धरणाची फूटभर देखील उंची वाढलेली नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गलवाडा धरणावर शेंदुर्णीसाठी मुख्य पाणीपुरवठा योजना सुरू आहे. गलवाडा धरणातून शेंदुर्णीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर मात्र दिवसाला आठ तासच वीजपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा यांनी जर लक्ष घातले असते तर या धरणावर स्वतंत्र फीडर टाकून २४ तास वीजपुरवठा चालू ठेवला असता, परंतु अत्यंत महत्त्वाच्या जीवन मरणाच्या या पाणी प्रश्नाकडे डोळ्यातून पाणी येईपर्यंत देखील शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेंदुर्णी येथील नगरपंचायतीने या धरणावर डायनामा जनरेटर डिझेल खर्च करून धरणावरून पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचण्यासाठी लाखोंचा इंधन खर्च करून वेळ मारून न्यायची सर्कस चालवली असल्याची स्थिती आहे.खान्देशातील प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदुर्णी नगरीत सोयगाव तालुक्यातील धरणातून पाणीपुरवठा नियोजनबद्ध सुरू होता. काँग्रेसच्या ताब्यातील ग्रा.पं. कारभाराच्या वेळेस ४ कोटी २२ लाख रुपये निधी आघाडीच्या सरकारने मंजूर केला; परंतु काम सुरू झाल्यानंतर काहींनी पाण्याची समस्या निर्माण केली. याबाबतचा वाद अद्याप न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाली.पाण्याबाबत प्रशासन झोपलेलेशेंदुर्णीला सोयगावहून पाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनमध्ये झाडांच्या मुळा येऊन पाणीपुरवठा ठप्प झाला होता, त्यावेळेस झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. पाईप लाईन शोधता शोधता अखेर पाईप लाईनमधील झाडांच्या मुळापर्यंत पोहोचले. परंतु आज उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर मात्र शासन पातळीवर पूर्णपणे दुर्लक्षच झाले आहे.शेंदुर्णीला गोंदेगाव धरणाजवळील विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. यंदा कमी पावसामुळे धरणातील पाणी संपले. विहीर कोरडी पडली. सध्या गलवाडा धरणातून पाण्याची उचल केली जात आहे. जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने जादा अश्वशक्तीचे पंप चालवू शकत नाही. २४ हजार लीटर क्षमतेच्या दोन शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एक विहीर अधिग्रहीत केली आहे. आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.-राहुल पाटील, मुख्याधीकारी, नगरपंचायत, शेंदुर्णी.