शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

शेंदुर्णी गावाला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:23 IST

नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार : जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांवर भटकंतीची वेळ

शेंदूर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सोयगाव तालुक्यातील धरणात पाणी असूनदेखील पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेंदुर्णी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील अंधारी येथे पाण्याची समस्या मोठी बिकट झाली आहे.सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी जलसंपदामंत्री यांनी आमच्या धरणाची उंची वाढवून द्यावी व शेंदुर्णीला लागणारे पाणी तुम्ही नेऊ शकतात असे सर्व राजकीय पक्ष व नागरिक खुल्या मनाने मान्य करतात परंतु महाराष्ट्रातील जलसंपदा सर्वोच्च खातं जामनेर तालुक्याच्या वाट्याला येऊनदेखील शेंदुर्णी व परिसरात नवीन धरण नाही अथवा एकही धरणाची फूटभर देखील उंची वाढलेली नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गलवाडा धरणावर शेंदुर्णीसाठी मुख्य पाणीपुरवठा योजना सुरू आहे. गलवाडा धरणातून शेंदुर्णीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर मात्र दिवसाला आठ तासच वीजपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा यांनी जर लक्ष घातले असते तर या धरणावर स्वतंत्र फीडर टाकून २४ तास वीजपुरवठा चालू ठेवला असता, परंतु अत्यंत महत्त्वाच्या जीवन मरणाच्या या पाणी प्रश्नाकडे डोळ्यातून पाणी येईपर्यंत देखील शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेंदुर्णी येथील नगरपंचायतीने या धरणावर डायनामा जनरेटर डिझेल खर्च करून धरणावरून पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचण्यासाठी लाखोंचा इंधन खर्च करून वेळ मारून न्यायची सर्कस चालवली असल्याची स्थिती आहे.खान्देशातील प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदुर्णी नगरीत सोयगाव तालुक्यातील धरणातून पाणीपुरवठा नियोजनबद्ध सुरू होता. काँग्रेसच्या ताब्यातील ग्रा.पं. कारभाराच्या वेळेस ४ कोटी २२ लाख रुपये निधी आघाडीच्या सरकारने मंजूर केला; परंतु काम सुरू झाल्यानंतर काहींनी पाण्याची समस्या निर्माण केली. याबाबतचा वाद अद्याप न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाली.पाण्याबाबत प्रशासन झोपलेलेशेंदुर्णीला सोयगावहून पाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनमध्ये झाडांच्या मुळा येऊन पाणीपुरवठा ठप्प झाला होता, त्यावेळेस झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. पाईप लाईन शोधता शोधता अखेर पाईप लाईनमधील झाडांच्या मुळापर्यंत पोहोचले. परंतु आज उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर मात्र शासन पातळीवर पूर्णपणे दुर्लक्षच झाले आहे.शेंदुर्णीला गोंदेगाव धरणाजवळील विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. यंदा कमी पावसामुळे धरणातील पाणी संपले. विहीर कोरडी पडली. सध्या गलवाडा धरणातून पाण्याची उचल केली जात आहे. जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने जादा अश्वशक्तीचे पंप चालवू शकत नाही. २४ हजार लीटर क्षमतेच्या दोन शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एक विहीर अधिग्रहीत केली आहे. आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.-राहुल पाटील, मुख्याधीकारी, नगरपंचायत, शेंदुर्णी.