शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:33 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार.

ज्याने ‘शोले’ चित्रपट पाहिलेला नाही, असा माणूस भारतवर्षाच्या इतिहासात, वर्तमानात आणि भूगोलावर शोधूनही सापडणार नाही. एकवेळ रामायण, महाभारत, बायबल, कुराण इत्यादी ग्रंथ माहीत नसलेली व्यक्ती सापडेल, पण ‘शोले’ न पाहिलेली व्यक्ती सापडणे म्हणजे ‘गुल बकावलीचं फूल’ सापडण्यासारखं आहे. (आता, गुलबकावली म्हणजे काय? असा प्रश्न जर, आजीच्या तोंडून गोष्टी न ऐकताच लहानाचा मोठे झालेल्या मानवाने मला विचारला, तर मला, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली, मी त्याच्यावर खटला भरीन.)चाळीस, पंचेचाळीस वर्षे होत आलीत तरी लोक न थकता शोले बघताय आणि त्याच्याबद्दल न थकता बोलताय अशी ‘शोले’ ही देदीप्यमान, अजरामर कलाकृती. ती बघा २०-२५ झोपड्या आणि एक ठाकूरची गढी, उर्फ दुमजली वाडा असलेली रामगढ नावाची वस्ती. नायकाला दारू पिऊन वर चढून आत्महत्येचं नाटक करता येण्यासाठी उभारलेली उंचावरची पाण्याची टाकी. तिच्या साक्षीने समोरच्याच विहिरीवरून, मातीच्या घागरींमधून, पाणी भरून नेणाऱ्या स्त्रिया. ‘मातीच्या’ घागरीतूनच अशासाठी, की जर घोड्यावरून खदडक खदडक करत डाकू आलेत, तर त्यांना एखाद्या गोरीच्या डोक्यावरील घड्याला नेम धरून गोळी मारता यायला हवी. घड्याला छानसं कलात्मक गोल भोक पडून, त्यातून पाण्याची धार लागणार. डाकूंना उगीचच गोळ्या खर्ची घालाव्या लागू नयेत म्हणून पनघटवरच्या उरलेल्या पनीहारीनी डोक्यावरच्या मातीच्या घागरी स्वत:च किंचाळत फोडून टाकत सैरावैरा पळणार. हजार घरांच्या वस्तीला पुरून उरेल एवढी मोठी पाण्याची टाकी उशाशी असताना, २०-२५ झोपड्या असलेल्या रामगढवासी स्त्रिया विहिरीवरून पाणी का भरतात? काय करणार बिच्चाºया, त्या पाण्याच्या टाकीला नळच जोडलेले नाहीत. बरं, नळ असते तरी काय उपयोग, पाणी खालून वर टाकीत चढवायला विजेची मोटार नको का? पण गावात वीजच नाही. वीज असती तर सगळ्यात आधी श्रीमंत ‘ठाकूर की हवेली’ उजळून निघाली नसती का? पण गावातच वीज नाही म्हणून हवेलीतही वीज नाही. वीज असती तर ठाकूरची वीजवंचित विधवा सून बिचारी उगाचंच संध्याकाळी गॅसबत्तीची ज्योत मोठी करून पेटवण्याच्या आणि सकाळ झाली, की ज्योत लहान करत विझवण्याच्या कामावर नेमल्यासारखी दिसली असती का? ‘गब्बरसिंग’ हा वेडसर दाखवला आहे. ते योग्यच आहे. गावात वीज नाही, चक्की नाही, आणि हे बाळ विचारतं, ‘ये रामगढ वाले कौनसी चक्कीका पिसा आटा खाते है रे’. वेडा कुठला! वेडा नाही तर काय, ज्या घरात विधवा सून आणि तिचा म्हातारा सासरा, असे फक्त दोनच व्यक्ती आहेत. अशा घरातल्या सासºयाचे दोन्ही हात छाटून टाकायचे, म्हणजे सगळीच कल्पनातीत पंचाईत की! नाही म्हणायला एक उत्तम केले आहे. विरू आणि बसंती ह्यांचे प्रेम तडीस जाऊ दिले आहे. पण ठाकूराच्या विधवेचं प्रेम काही सफल होऊ दिलेलं नाही. तिथे जय ह्या नायकाचा मृत्यू अचूकपणे मदतीला धाऊन आलाय. कल्पना करा ना राव, खानदानी ठाकूरच्या घरातील ‘विधवेचा पुनर्विवाह’ दाखवला असता, तर समस्त भारतातील ठाकूरांनी ‘शोले’लाच आग लावून नसती का टाकली. गहाणवटीतली डोकीसुद्धा जपावी लागतात राव ! (अपूर्ण)