शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:33 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार.

ज्याने ‘शोले’ चित्रपट पाहिलेला नाही, असा माणूस भारतवर्षाच्या इतिहासात, वर्तमानात आणि भूगोलावर शोधूनही सापडणार नाही. एकवेळ रामायण, महाभारत, बायबल, कुराण इत्यादी ग्रंथ माहीत नसलेली व्यक्ती सापडेल, पण ‘शोले’ न पाहिलेली व्यक्ती सापडणे म्हणजे ‘गुल बकावलीचं फूल’ सापडण्यासारखं आहे. (आता, गुलबकावली म्हणजे काय? असा प्रश्न जर, आजीच्या तोंडून गोष्टी न ऐकताच लहानाचा मोठे झालेल्या मानवाने मला विचारला, तर मला, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली, मी त्याच्यावर खटला भरीन.)चाळीस, पंचेचाळीस वर्षे होत आलीत तरी लोक न थकता शोले बघताय आणि त्याच्याबद्दल न थकता बोलताय अशी ‘शोले’ ही देदीप्यमान, अजरामर कलाकृती. ती बघा २०-२५ झोपड्या आणि एक ठाकूरची गढी, उर्फ दुमजली वाडा असलेली रामगढ नावाची वस्ती. नायकाला दारू पिऊन वर चढून आत्महत्येचं नाटक करता येण्यासाठी उभारलेली उंचावरची पाण्याची टाकी. तिच्या साक्षीने समोरच्याच विहिरीवरून, मातीच्या घागरींमधून, पाणी भरून नेणाऱ्या स्त्रिया. ‘मातीच्या’ घागरीतूनच अशासाठी, की जर घोड्यावरून खदडक खदडक करत डाकू आलेत, तर त्यांना एखाद्या गोरीच्या डोक्यावरील घड्याला नेम धरून गोळी मारता यायला हवी. घड्याला छानसं कलात्मक गोल भोक पडून, त्यातून पाण्याची धार लागणार. डाकूंना उगीचच गोळ्या खर्ची घालाव्या लागू नयेत म्हणून पनघटवरच्या उरलेल्या पनीहारीनी डोक्यावरच्या मातीच्या घागरी स्वत:च किंचाळत फोडून टाकत सैरावैरा पळणार. हजार घरांच्या वस्तीला पुरून उरेल एवढी मोठी पाण्याची टाकी उशाशी असताना, २०-२५ झोपड्या असलेल्या रामगढवासी स्त्रिया विहिरीवरून पाणी का भरतात? काय करणार बिच्चाºया, त्या पाण्याच्या टाकीला नळच जोडलेले नाहीत. बरं, नळ असते तरी काय उपयोग, पाणी खालून वर टाकीत चढवायला विजेची मोटार नको का? पण गावात वीजच नाही. वीज असती तर सगळ्यात आधी श्रीमंत ‘ठाकूर की हवेली’ उजळून निघाली नसती का? पण गावातच वीज नाही म्हणून हवेलीतही वीज नाही. वीज असती तर ठाकूरची वीजवंचित विधवा सून बिचारी उगाचंच संध्याकाळी गॅसबत्तीची ज्योत मोठी करून पेटवण्याच्या आणि सकाळ झाली, की ज्योत लहान करत विझवण्याच्या कामावर नेमल्यासारखी दिसली असती का? ‘गब्बरसिंग’ हा वेडसर दाखवला आहे. ते योग्यच आहे. गावात वीज नाही, चक्की नाही, आणि हे बाळ विचारतं, ‘ये रामगढ वाले कौनसी चक्कीका पिसा आटा खाते है रे’. वेडा कुठला! वेडा नाही तर काय, ज्या घरात विधवा सून आणि तिचा म्हातारा सासरा, असे फक्त दोनच व्यक्ती आहेत. अशा घरातल्या सासºयाचे दोन्ही हात छाटून टाकायचे, म्हणजे सगळीच कल्पनातीत पंचाईत की! नाही म्हणायला एक उत्तम केले आहे. विरू आणि बसंती ह्यांचे प्रेम तडीस जाऊ दिले आहे. पण ठाकूराच्या विधवेचं प्रेम काही सफल होऊ दिलेलं नाही. तिथे जय ह्या नायकाचा मृत्यू अचूकपणे मदतीला धाऊन आलाय. कल्पना करा ना राव, खानदानी ठाकूरच्या घरातील ‘विधवेचा पुनर्विवाह’ दाखवला असता, तर समस्त भारतातील ठाकूरांनी ‘शोले’लाच आग लावून नसती का टाकली. गहाणवटीतली डोकीसुद्धा जपावी लागतात राव ! (अपूर्ण)