शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आजोबा, वडिलांकडून सहकाराचा घेतला वारसा - भालचंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:18 IST

जळगाव पीपल्स सहकारी बँकेत आता चौथी पिढी कार्यरत

सुशील देवकरमन्य जनतेची सावकारी पाशातून सुटका करून त्यांची आर्थिक पिळवणूक थांबविणे, त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या दि जळगाव पीपल्स को-आॅप बँकेचे चेअरमनपद भूषविलेल्या रामदास लहानू पाटील या आजोबांकडून तसेच त्यानंतर बँकेची धुरा वसा म्हणून सांभाळणाऱ्या काका यशवंतराव, वडिल भालचंद्र पाटील यांच्याकडून सहकाराचा वारसा घेत बँकेचे विद्यमान चेअरमन भालचंद्र पाटील हे वाटचाल करीत आहेत. आता पाटील घराण्यातील चौथी पिढी अनिकेत भालचंद्र पाटील हे देखील सहकाराच्या दिंडीत सहभागी झाले आहे.याबाबत भालचंद्र पाटील यांनी सांगितले की, जळगाव पीपल्स बँकेची स्थापना २३ डिसेंबर १९३३ रोजी आजोबा कै.रामदास लहानू पाटील यांनी केली. ते २८ सप्टेंबर १९४७ ला चेअरमन झाले. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकींगचेच नव्हे तर सहकारातील प्रगतीचे नवे पर्व सुरू झाले. त्यांच्या शब्दाखातर सामान्य माणूस बँकेत ठेव ठेवत होता. फक्त बँक हेच त्यांचे कार्यक्षेत्र नव्हते तर ते तत्कालीन मुंबई सरकारच्या कायदे मंडळाचे सदस्यही होते. म्हणजेच आजचे आमदार होते.शहरातील बहुतांशी धार्मिक, सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीत जळगावातील काही धनाढ्य शक्तींनी एकत्र येऊन त्यांच्या पॅनल विरूद्ध पॅनल उभे केले. मात्र समाजाने त्यांचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. सभासदांनी पाटील घराण्यानेच बँकेच्या चेअरमनपदाचा पदभार पहावा, अशी आग्रही भूमिका वारंवार घेतली.वारसा पुढच्या पिढीकडेपाटील कुटुंबातील सहकाराचा हा वारसा आता पुढच्या चौथ्या पिढीकडे सोपविला आहे. भालचंद्र पाटील यांचे चिरंजीव अनिकेत यांना सभासदांच्या आग्रहावरून बँकेचे संचालक करण्यात आले आहे.स्वत:चा व्यवसाय सांभाळून सहकाराचा वसाबँकेचे विद्यमान चेअरमन भालचंद्र पाटील हे केमिकल इंजिनियर असून यशस्वी उद्योजकही आहेत. आजोंबाप्रमाणे वडिलांनी दिलेले संस्कार यामुळे स्वत:चे शैक्षणिक करीअर आणि चारित्र्य याचे संवर्धन करू शकतो. मी स्वावलंबी व उद्यमशिल होण्यास त्यांचा मोठा वाटा असल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले. ५ जून २००६ रोजी बँकेचे चेअरमनपद स्विकारत सहकाराचा वसा घेतला. माझे दोन पितृतुल्य मार्गदर्शक कै.बाबुशेठ चौबे आणि जयंतीभाई दोशी या दोघांनी मला घडविले. वडिलांची माया दिली. या प्रवासात आईने, पत्नीने तसेच लहान भावानेही साथ दिली. त्याच बळावर सहकाराचा वारसा पुढे नेण्यात यशस्वी झालो.८५ वर्ष नफा मिळविणारी एकमेव बँकबँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सचोटीने व्यवहार केल्याने आज बँकेचा एकूण व्यवसाय २७४० कोटी इतका झाला आहे. गेल्या ८५ वर्षांपासूनसतत नफा मिळविणारी जळगाव पीपल्स बँक ही महाराष्टÑातील एकमेव बँक असावी. बँकेच्या ४० शाखांपैकी १४ शाखा स्व-मालकीच्या जागेत आहेत. बँकेची प्रगती साधण्यात यश आल्यानेच भालचंद्र पाटील यांना अखिल भारतीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट बँक चेअरमन हा पुरस्कार मिळाला. तसेच दिव्यांगांसाठी विशेष कार्य करणारी बँक म्हणून राष्टÑपतींच्या हस्ते गौरव झाला.मी जरी आज गेली १६ वर्ष बँकेचा चेअरमन असलो तरी त्यात माझे कर्तृत्व फार थोडे आहे. कारण मला हा वारसा माझे वडील कै.प्रभाकर पाटील आणि आजोबा सहकारातले ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कै.रामदास लहानू पाटील यांच्याकडून मिळाला आहे. शिस्तबद्ध संचालक मंडळ, भविष्याचा वेध घेत कार्पोरेट पद्धतीने कार्य करणारे व्यवस्थापन, प्रामाणिक कर्मचारी वर्ग, सभासद, ठेवीदार यांच्या सहकार्याच्या बळावर बँकेच्या प्रगतीची घौडदौड कायम ठेवण्यात यश आले.-भालचंद्र पाटील, चेअरमन, दि जळगाव पिपल्स को-आॅप. बँक लि.

 

 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव