शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

ग्रामविकास निधी, अपहारावरून शेकडो ग्रामसेवक रडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दप्तर दडवल्याने ८ ग्रामसेवकांवर कठोर कारवाई झाल्यानंतर आता विविध योजना आणि कर्ज प्रकरणांच्या फायली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दप्तर दडवल्याने ८ ग्रामसेवकांवर कठोर कारवाई झाल्यानंतर आता विविध योजना आणि कर्ज प्रकरणांच्या फायली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने उघडल्या असून ग्रामविकास निधीचे २२ कोटींचे कर्ज थकविणाऱ्या ५६ ग्रामसेवकांना पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासह ७१६ ग्रामपंचायतींमधील विविध अपहारांबाबतही गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन माहिती मागविण्यात आली आहे.

जिल्ह्यात ८ ग्रामसेवकांवर थेट कारावासाची कारवाई झाल्याने हा विषय राज्यभर चर्चिला जात आहे. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवसभर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागात वर्दळ वाढली होती. शिवाय विचारणा केली जात होती. दरम्यान, वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेली ग्रामविकास निधीची वसुली करण्यासंदर्भात आता हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. अनेक सभांमध्ये या विषयावरून वादळी चर्चा झाली होती. १९८० पासून विविध ग्रामपंचायतींनी विविध विकासकामांसाठी कर्ज घेतले होते. मात्र, ते परतच केले नव्हते. वाढत वाढत ही रक्कम थेट २२ कोटींच्या घरात गेली होती. यात पहिल्या टप्प्यात १०५ ग्रामसेवकांना ७ डिसेंबर रोजी नोटीस बजावल्या होत्या. नोटिशीनंतर २० लाखांचा भरणा केला तर काहींनी लेखी खुलासे सादर केले आहेत. मात्र, काहीच न करणाऱ्या ५६ ग्रामसेवकांना निर्वाणीचा इशारा म्हणून एक नोटीस पुन्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी बजावली आहे. कर्ज न भरल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल तसेच आगामी वेतनवाढही थांबविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

७५६ ग्रामपंचायतींमध्ये अपहार

ग्रामनिधी, जवाहर रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण योजना या योजना आता बंद आहेत. मात्र, त्या ज्या काळात राबविल्या गेल्या होत्या त्या काळात ग्रामसेवक व सरपंचांनी अपहार केला होता. ही रक्कम ७ कोटींच्या घरात असून आता नेमकी कोणाकडे किती वसुली बाकी आहे. याची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे पत्र ग्रामपंचायत विभागाने संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.