शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या 'एनओसी'नंतरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला. यामुळे ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला. यामुळे पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हा शासन निर्णय बदलून आता शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची घंटा आता ग्रामपंचायतींच्या ठरावावर अवलंबून आहे.

यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांविना सुरू आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनाने आता आदेश काढले आहेत. यातही ग्रामपंचायतींचा ठराव तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासंदर्भात पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेतील, त्याच गावात आता शाळा सुरू होणार आहे. प्राथमिक शाळांबाबत अद्यापतरी कोणताच निर्णय झाला नाही, त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागणार आहे.

००००००००००

जिल्ह्यातील एकूण शाळा - ३,३९९

शासकीय शाळा - ३१

अनुदानित शाळा -९६२

विनाअनुदानित शाळा - १५६

जिल्ह्यातील एकूण गावे - १,४९९

जिल्ह्याती कोरोनामुक्त गावे - १,१७९

००००००००००

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

अमळनेर - १४२

भडगावा - ४६

भुसावळ - ५०

बोदवड- २२

चाळीसगाव - ९८

चोपडा- ९२

धरणगाव - ८६

एरंडोल - ४२

जळगाव - ७४

जामनेर - ११९

मुक्ताईनगर - ६१

पाचोरा - ९०

पारोळा - ९५

रावेर - १०१

यावल - ६१

००००००००००

ग्रामपंचायतींना पाठविले पत्र

शासन आदेशानंतर शिक्षण विभागाने शाळांमार्फत ग्रामपंचायतींना पत्र पाठवून कोरोनामुक्त शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेण्याचे कळविले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव झाल्यानंतर त्या गावात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीने असा ठराव घेतला नसला तरी काही गावांत अशा प्रकारची तयारी सुरू करण्यात आली आहे.

००००००००००

शासनाचे आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्‍याचा निर्णय हा ग्रामपंचायतींच्या ठरावावर अवलंबून आहे. नुकतेच ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे. किती शाळांनी ठराव केले, हे सोमवारी शिक्षण विभागाला प्राप्त ठरावानुसार कळेल.

- बी. जे. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी

००००००००००

शाळाही तयार...

जिल्ह्यातील सर्वच गावातील शाळा सज्ज आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मुलेसुध्‍दा घरात अडकली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक चिंतेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. तसेच पालकसुध्दा पाल्यास पाठविण्यास तयार आहेत.

००००००००००

पालकांची होकार

कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. त्यामुळे मागील सत्रापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा गावात शाळा सुरू करण्यास काहीही हरकत नाही. पाल्यास पाठविण्यास आमची संमती आहे. शाळा, महाविद्यालयांनीसुध्दा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी.

-विद्या खरात, पालक

०००००

कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे गावातील शाळा तसेच शहरातील काही वर्ग सोशल डिस्टन्सचे नियम पाळून सुरू करण्यास काहीच हरकत नाही. यामुळे शाळा सुरू करणेच योग्य ठरेल.

- भूषण महाजन, पालक