शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसमारंभच कोरोना वाढीला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात कोरोनाची रुग्णवाढ समोर येत असताना जळगावात कोरोना वाढीमागे ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसमारंभातील गर्दी कारणीभूत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात कोरोनाची रुग्णवाढ समोर येत असताना जळगावात कोरोना वाढीमागे ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसमारंभातील गर्दी कारणीभूत असल्याचे मत काही तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या ठिकाणी कुठल्याच नियमांचे पालन न करता मोठी गर्दी झाली आणि कोरोना वाढल्याचे सांगितले जात आहे. रोज येणाऱ्या आकडेवारीवरूनही ते समोर येत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना फेब्रुवारीतच त्याच्यात वाढ होण्याची काही विशिष्ट कारणे समोर येत आहेत. यात ग्रामपंचायत निवडणूक, निकालाला झालेली अनियंत्रित गर्दी, एकमेकांचा वाढलेला संपर्क, शहरी भागातून ग्रामीण भागात मतदानासाठी गेलेले नागरिक, अशी अनेक कारणे कोरोनावाढीला कारणीभूत असू शकतात, असे काही डॉक्टरांचे मत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेत नियम पाळून जर मेळावे झाले असते तर रुग्णसंख्या आटोक्यात असती, असाही एक तर्क लढविला जात आहे. राष्ट्रवादीचे एकएक पदाधिकारी कोरोनाबाधित आढळून येत असल्याने हे मेळावेच रुग्णवाढीला कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.

कोट

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी नियम न पाळणे हे कोरोनावाढीचे मोठे कारण ठरू शकते, आता जी रुग्णवाढ समोर येत आहे, त्याचे विश्लेषण केले असता, जिल्ह्यात गर्दीला कारणीभूत काय काय घटना घडल्या ते शोधणे महत्त्वाचे आहे. मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न पाळणे ही कोरोना वाढीला निमंत्रित करणारी कारणे आहेत. - डॉ. भाऊराव नाखले, मेडिसीन विभागप्रमुख जीएमसी

ग्रामीण भागात शिरकाव

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाने धडक दिली आहे. यात शिरसोली येथे दोन दिवसात ७ बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लग्नसमारंभातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या ठिकाणी उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी नीलेश अग्रवाल यांनी केले आहे.

शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी तेजस्विनी देशमुख, आरोग्य सेवक अनिल महाजन व नीलेश चौधरी यांनी दोन दिवसात नागरिकांच्या तपासण्या केल्या आहेत.