शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्रामपंचायत निवडणूक: अमळगावला ईव्हीएममध्ये बिघाड मतदानासाठी दीड तास खोळंबा

By संजय पाटील | Updated: November 5, 2023 10:35 IST

कंटाळून काही शेतमजूर मतदान न करता कामाला निघून गेले.

संजय पाटील, अमळनेर (जि.जळगाव): अमळगाव ता. अमळनेर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ईव्हीएम बंद पडल्याने मतदानासाठी तब्बल दीड तास खोळंबा झाला. कंटाळून काही शेतमजूर मतदान न करता कामाला निघून गेले. रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

अमळगाव येथे सरपंच पदासाठी सात तर प्रभाग १ साठी एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी दोन ईव्हीएम युनिट वापरण्यात आले आहेत. सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.  तेव्हा एकच मतदान होत होते. दुसरे मतदान होत नसल्याने मतदारांसह कर्मचारी व अधिकारी गोंधळात पडले.  कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतरही मशिन सुरू होत नव्हते. निवडणूक अधिकारी मनोज सोनार यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याशी चर्चा केली. शेवटी मतदान यंत्र अमळनेरला पाठवण्यात आले.

नवीन यंत्र आणण्यात आले. दरम्यानच्या काळात शेतात जाण्यापूर्वी मतदान करण्यासाठी आलेले महिला,   मजूर ,शेतकरी वाट पाहून कंटाळले होते. आपली मजुरी बुडू नये म्हणून ते  मतदान सोडून शेताकडे निघाले. तब्बल दीड तासानंतर ९ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली. वायर खराब झाल्याने यंत्रणेत बिघाड झाला असल्याचे निवडणूक अधिकारी मनोज सोनार यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmalnerअमळनेर