शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. सदस्य बेपत्ता प्रकरण : वाकडी धरणाच्या भिंतीजवळ आढळले रक्ताचे निशाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:54 IST

वाकडी ते प्रिंपी धरणादरम्यान तपास

पहूर, ता. जामनेर : वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे बेपत्ता झाल्याप्रकरणात मंगळवारी अटकेतील सरंपच पती नामदार तडवी व विनोद देशमुख यांना वाकडी धरणाच्या भिंतीजवळ नेऊन चौकशी करण्यात आली. त्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. त्याचा पंचनामा करण्यात आला असून दोघांच्या घरी जाऊन काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तर माजी सरंपच चंद्रशेखर वाणी यांच्या घरी पोलीस गेले असता घराला कुलूप लावल्याचे दिसून आले आहे.पोलीस पाटलाकडून धागेदोरेपाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील स्थानिक पोलीस पाटलाला या घटनेची कुणकुण लागल्याची माहिती समोर येत असून त्यांनी पिंपळगाव हरेश्वरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना माहिती दिली होती. त्यावरून पोलिसांच्या हालचाली वाढल्या. त्यात २४रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह सर्व ताफा पिंप्री धरणावर गेला होता. तेथे मानवी शरीराचे अवशेष आडळून आले होते. त्यानंतर आता मंगळवारी पिंप्री परिसरात संपूर्ण जंगल पिंजून काढले. मुख्य आरोपी याच परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, तपासादरम्यान विनोदच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याचेही निष्पन्न झाले आहे.घटनास्थळी गर्दीपिंप्री धरणाच्या भींतीजवळ अटकेतील आरोपींना पोलिसांनी आणल्यानंतर चांदणे परिवारातील विनोदचे भाऊ, मुलगा उपस्थित होते. या सोबतच मातंग समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनाचा ईशाराया प्रकरणात गुन्हा दाखल असलेले माजी सरंपच चंद्रशेखर वाणी यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा डीवाएसपी केशवराव पातोंड यांना ग्रामस्थांनी दिला. मात्र पातोंड यांनी मातंग समाजाच्या भावना जाणून असून एक दोन दिवस थांबा तपास लागेल, असे सांगत आंदोलन न करण्याचे आवाहन केले.दुचाकी घेतली ताब्यातविनोद चांदणे यांची दुचाकी (एमएच, १९ बीसी ७०१५) वाकडीतील त्यांच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मंगळवारी संध्याकाळी वाकडीतील सात ते आठ ग्रामस्थांना पहूर पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची चौकशी व विचारपूस करण्यात आली. त्यांच्या सोबत पोलीस पाटील घन:श्याम पाटील होते.‘पप्पा कधी येणार.....’विनोद चांदणे आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांचा मुलगा तेजस हा ‘पप्पा कधी येणार.....’ अशी विचारणा राजेंद्र चांदणे यांच्याकडे करीत आहे. त्यामुळे मुलाचे हे शब्द एकून सर्वांचाच कंठ दाटून येत आहे. विनोद घरापासून दूर गेल्याने तो कधी परतणार याकडे परिवाराच्या नजरा लागल्या असून कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव