शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीत समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST

मुक्ताईनगर : येथे नगरपंचायत स्थापन होऊन चार वर्षे झाली तरी अद्याप तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीत समावेशन करण्यात आले ...

मुक्ताईनगर : येथे नगरपंचायत स्थापन होऊन चार वर्षे झाली तरी अद्याप तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीत समावेशन करण्यात आले नाही. तरी या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.

संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना नगरपंचायत प्रशासन असूनसुद्धा त्यांचे समावेशन नसल्याने सुविधांचा लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्व नगरपंचायत व नगरपालिकांचे समावेशन झाले आहे. जिल्ह्यात मुक्ताईनगर ही एकमेव नगरपंचायत अशी आहे की, ज्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. त्यामुळे शासन नगरपंचायत प्रशासनाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. नगरपंचायत अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा उदा. शाळा, हॉस्पिटल रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल व इतर मूलभूत सुविधांपासून मुक्ताईनगर शहरातील जनतेला सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार हा मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या माध्यमातून जी कर कसुली होते त्या करामधून दिला जातो. चार वर्षाला जवळपास १ कोटी ४४ लाख इतका पगार हा मुक्ताईनगर नगरपंचायतीद्वारे दिला गेला. जर मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाने वेळीच कर्तव्यदक्षता दाखविली असती तर करोडो रुपयांचा निधी हा मुक्ताईनगर शहराच्या विकासासाठी वापरता आला असता, असा आरोपही सोनवणे यांनी केला आहे.