शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाठ खरेदी केलेली तूर खपवण्यासाठी शासनाची शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 19:46 IST

कार्ड नसलेल्यांनाही रेशन दुकानावर मिळणार ‘अनलिमिटेड’ डाळ

ठळक मुद्देभाव केवळ ५५ रूपये किलो मॉलमध्येही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नरेशन दुकानदारांच्या कमिशनमध्येही वाढ

जळगाव : शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी मागील वर्षी (२०१६-१७ मध्ये) नाफेडच्या केंद्रांच्या खरेदीनंतरही उरलेली सुमारे २५ लाख क्विंटल तूर शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत प्रथमच स्वत: खरेदी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेल्या तूरीचे करायचे काय? असा प्रश्न शासनाला पडला आहे. त्यामुळे ही तूर खराब होण्यापूर्वीच त्याची डाळ करून ती रेशन दुकान, मॉल्समधून बाजारभावापेक्षा कमी म्हणजे ५५ रूपये किलो प्रमाणे विकण्याची शक्कल शासनाने लढवली आहे.तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने रेशनदुकानदारांना यातील कमिशन वाढवून देत ते प्रतिकिलो ३ रूपये करण्यात आले आहे.२०१६-१७ मध्ये जिल्ह्यात झालीय १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदीतुरीची लागवड वाढल्याने २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत ९ केंद्रांवर ५ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे एकूण १ लाख ३२ हजार ७६३ क्विंटल तूर खरेदी झाली होती. त्यात जळगाव केंद्रावर ३७७१ क्विंटल, जामनेर २७ हजार ५०४.३० क्विंटल, बोदवड २७ हजार ८१४.५० क्विटल, मुक्ताईनगर ३२ हजार १७०.५०, रावेर १३६०१, चोपडा २७८३, पाचोरा ९५१९.५०, अमळनेर ७७६३, चाळीसगाव ७८६६.५० क्विटल याप्रमाणे खरेदी झाली होती. मात्र त्यावेळी व्यापाºयांनी आधीच शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून नंतर शासनाच्या हमीभाव केंद्रावर जादा भावाने विक्री केल्याच्या तक्रारी आल्याने या तूरखरेदी घोटाळ्याची चौकशीही झाली होती. त्यामुळे २०१७-१८ मध्ये शासनाने या खरेदी केंद्राचे निकष कडक केले. आॅनलाईन नोंदणी सक्तीची केली.२०१७-१८ मध्ये सुमारे ५२ हजार क्विंटल तुर खरेदी२०१७-१८ मध्ये मात्र नाफेडच्या केंद्रांवरच सुमारे ९ हजार शेतकºयांनी तुरीची नोंदणी केली असून आतापर्यंत ६०हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. अजून २५ हजार क्विंटल तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. नाफेडच्या केंद्रांची मुदतही शासनाने वाढवून १५ मे पर्यंत केली आहे. तरीही तूर शिल्लक राहिली तर मागील वर्षीप्रमाणे शासन स्वत: तूर खरेदीचा निर्णय घेऊ शकते. मात्र सध्यातरी तशी आवश्यकता नसल्याचे चित्र आहे.मागील वर्षी झाली होती ७० लाख क्विंटल तूर खरेदी२०१६-१७ मध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाफेडच्या केंद्रांवर तसेच शासनामार्फत मिळून राज्यभरातून सुमारे ७० लाख क्विंटल तूर खरेदी झाली. त्यात राज्य शासनाने प्रथमच २५ लाख क्विंटल तूर खरेदी केली.३ महिन्यांपासून रेशन दुकानांवर विक्रीमोठा निधी खर्चून खरेदी केलेली ही तूर गोडावूनमध्ये पडून राहिल्यास खराब होण्याची भिती असल्याने शासनाने या तुरीची डाळ करून विक्रीचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या निर्णयानुसार या तुरीची डाळ करून ती १ किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांमार्फत मागणी नोंदविल्यानंतर मागणीनुसार डाळीचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यात ५ हजार ८०० क्विंटल डाळीची मागणी जिल्हा पुरवठा विभागातर्फे नोंदविण्यात आली होती. त्यानुसार डाळीचा साठा रेशनदुकानांवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र रेशनकार्ड नसलेल्यांनाही केवळ ५५ रूपये किलो दराने कितीही डाळ खरेदी करता येणार असल्याची माहितीच लोकांपर्यंत न पोहोचल्याने यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.कमिशनमध्ये वाढ; मॉलमध्येही उपलब्ध करून देणारशासनाला या योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करीत प्रतिकिलो ३ रूपये करण्यात आले आहे. तसेच मॉलमध्येही ही डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेशन दुकानांवरही रेशन कार्ड नसलेल्यांनाही ही डाळ कितीही प्रमाणात खरेदी करता येणार आहे.बाजारभावापेक्षा कमी भावबाजारात सध्या तूरडाळ ५८ ते ६२ रूपये किलो दराने उपलब्ध आहे. मात्र शासनाकडून रेशनदुकानांवर ही डाळ ५५ रूपये किलो या द राने उपलब्ध करून देण्यात आली आहे.