शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
2
Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
3
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, पटापट चेक करा नवे दर
4
इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्य, 'नाविक' प्रणालीसाठी गंभीर संकट
5
एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
6
"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
7
"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
8
मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन
9
'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?
10
इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
11
IND vs NZ: एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग; बलाढ्य संघांना जमलं नाही, ते करून दाखवलं!
12
BSNL चा धमाका: वर्षभरासाठी रिचार्जची कटकट संपली! 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळतोय ३GB डेटा आणि बरंच काही
13
मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... 
14
मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!
15
८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
16
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
17
Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
18
Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
19
अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
20
संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाठ खरेदी केलेली तूर खपवण्यासाठी शासनाची शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 19:46 IST

कार्ड नसलेल्यांनाही रेशन दुकानावर मिळणार ‘अनलिमिटेड’ डाळ

ठळक मुद्देभाव केवळ ५५ रूपये किलो मॉलमध्येही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नरेशन दुकानदारांच्या कमिशनमध्येही वाढ

जळगाव : शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी मागील वर्षी (२०१६-१७ मध्ये) नाफेडच्या केंद्रांच्या खरेदीनंतरही उरलेली सुमारे २५ लाख क्विंटल तूर शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत प्रथमच स्वत: खरेदी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेल्या तूरीचे करायचे काय? असा प्रश्न शासनाला पडला आहे. त्यामुळे ही तूर खराब होण्यापूर्वीच त्याची डाळ करून ती रेशन दुकान, मॉल्समधून बाजारभावापेक्षा कमी म्हणजे ५५ रूपये किलो प्रमाणे विकण्याची शक्कल शासनाने लढवली आहे.तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने रेशनदुकानदारांना यातील कमिशन वाढवून देत ते प्रतिकिलो ३ रूपये करण्यात आले आहे.२०१६-१७ मध्ये जिल्ह्यात झालीय १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदीतुरीची लागवड वाढल्याने २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत ९ केंद्रांवर ५ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे एकूण १ लाख ३२ हजार ७६३ क्विंटल तूर खरेदी झाली होती. त्यात जळगाव केंद्रावर ३७७१ क्विंटल, जामनेर २७ हजार ५०४.३० क्विंटल, बोदवड २७ हजार ८१४.५० क्विटल, मुक्ताईनगर ३२ हजार १७०.५०, रावेर १३६०१, चोपडा २७८३, पाचोरा ९५१९.५०, अमळनेर ७७६३, चाळीसगाव ७८६६.५० क्विटल याप्रमाणे खरेदी झाली होती. मात्र त्यावेळी व्यापाºयांनी आधीच शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून नंतर शासनाच्या हमीभाव केंद्रावर जादा भावाने विक्री केल्याच्या तक्रारी आल्याने या तूरखरेदी घोटाळ्याची चौकशीही झाली होती. त्यामुळे २०१७-१८ मध्ये शासनाने या खरेदी केंद्राचे निकष कडक केले. आॅनलाईन नोंदणी सक्तीची केली.२०१७-१८ मध्ये सुमारे ५२ हजार क्विंटल तुर खरेदी२०१७-१८ मध्ये मात्र नाफेडच्या केंद्रांवरच सुमारे ९ हजार शेतकºयांनी तुरीची नोंदणी केली असून आतापर्यंत ६०हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. अजून २५ हजार क्विंटल तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. नाफेडच्या केंद्रांची मुदतही शासनाने वाढवून १५ मे पर्यंत केली आहे. तरीही तूर शिल्लक राहिली तर मागील वर्षीप्रमाणे शासन स्वत: तूर खरेदीचा निर्णय घेऊ शकते. मात्र सध्यातरी तशी आवश्यकता नसल्याचे चित्र आहे.मागील वर्षी झाली होती ७० लाख क्विंटल तूर खरेदी२०१६-१७ मध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाफेडच्या केंद्रांवर तसेच शासनामार्फत मिळून राज्यभरातून सुमारे ७० लाख क्विंटल तूर खरेदी झाली. त्यात राज्य शासनाने प्रथमच २५ लाख क्विंटल तूर खरेदी केली.३ महिन्यांपासून रेशन दुकानांवर विक्रीमोठा निधी खर्चून खरेदी केलेली ही तूर गोडावूनमध्ये पडून राहिल्यास खराब होण्याची भिती असल्याने शासनाने या तुरीची डाळ करून विक्रीचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या निर्णयानुसार या तुरीची डाळ करून ती १ किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांमार्फत मागणी नोंदविल्यानंतर मागणीनुसार डाळीचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यात ५ हजार ८०० क्विंटल डाळीची मागणी जिल्हा पुरवठा विभागातर्फे नोंदविण्यात आली होती. त्यानुसार डाळीचा साठा रेशनदुकानांवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र रेशनकार्ड नसलेल्यांनाही केवळ ५५ रूपये किलो दराने कितीही डाळ खरेदी करता येणार असल्याची माहितीच लोकांपर्यंत न पोहोचल्याने यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.कमिशनमध्ये वाढ; मॉलमध्येही उपलब्ध करून देणारशासनाला या योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करीत प्रतिकिलो ३ रूपये करण्यात आले आहे. तसेच मॉलमध्येही ही डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेशन दुकानांवरही रेशन कार्ड नसलेल्यांनाही ही डाळ कितीही प्रमाणात खरेदी करता येणार आहे.बाजारभावापेक्षा कमी भावबाजारात सध्या तूरडाळ ५८ ते ६२ रूपये किलो दराने उपलब्ध आहे. मात्र शासनाकडून रेशनदुकानांवर ही डाळ ५५ रूपये किलो या द राने उपलब्ध करून देण्यात आली आहे.