शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शासनाच्या निर्णयाचा महावितरणला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

जळगाव परिमंडळ : १ हजार कोटींच्या वीजबिल वसुलीचे महावितरणपुढे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाकाळात लाखो ग्राहकांनी ...

जळगाव परिमंडळ : १ हजार कोटींच्या वीजबिल वसुलीचे महावितरणपुढे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाकाळात लाखो ग्राहकांनी वीज बिल थकविल्यामुळे महावितरणतर्फे सर्वत्र जोरदार कारवाई मोहीम सुरू होती. मात्र, आता राज्यशासनानेच वीज बिल खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्यामुळे, महावितरणला या निर्णयाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे खान्देशात सद्य:स्थितीला विविध प्रकारच्या वीज ग्राहकांकडे महावितरणची तब्बल एक हजार कोटींच्या घरात थकबाकी असून, ही वसुली करण्यासाठी महावितरणसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोना काळात महावितरणतर्फे शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी जाऊन रीडिंग न घेता नागरिकांना चार महिने सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, महावितरणने दिलेले सरासरी वीज बिल हे अवाजवी असल्याचे सांगत अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे महावितरण प्रशासनाने ग्राहकांच्या वीज बिलबाबत तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार निवारण शिबिरेही घेतले. वीज बिलाबाबत नागरिकांच्या तक्रारीही दूर केल्या. मात्र, तरीदेखील खान्देशातील बहुतांश ग्राहकांनी वीज बिल न भरल्यामुळे खान्देशात तब्बल एक हजार कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. या मध्ये सर्वाधिक ६६० कोटींची थकबाकी जळगाव जिल्ह्यात असून, धुळे जिल्ह्यात ३७८ तर नंदुरबार जिल्ह्यात ३०१ कोटींची थकबाकी आहे. दरम्यान, महिनाभरापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे यातील किती कोटींची वसुली झाली, याबाबत महावितरणतर्फे माहिती देण्यात आली नाही.

महावितरणच्या वसुली मोहिमेला उपमुख्यमंत्र्यांचा झटका

थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महावितरण प्रशासनाने गेल्या महिन्यापासून थकबाकीदार ग्राहकांविरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेतली होती. थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावूनही वीज बिल भरण्यात येत नसल्यामुळे फेब्रुवारी अखेर खान्देशात हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. महावितरणची ही मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत असल्यामुळे या कारवाईला अनेक ठिकाणी विरोधदेखील झाला. तर काही ठिकाणी महावितरण विरोधात आंदोलन होत असल्यामुळे याचे पडसाद सद्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात महावितरणच्या वीजपुरवठा खंडित करण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर केले. शासनाच्या या निर्णयामुळे महावितरणच्या वसुली मोहिमेला झटका बसला आहे.

शासनाने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे जाहीर केले आहे. वसुली मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. महावितरण प्रशासन ग्राहकांना विनंती करून वसुली मोहीम सुरू ठेवणार आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ