शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात आणि राज्यात सरकारे बदलली मात्र धोरणे बदलली नाहीत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:32 IST

शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी चोपडा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले गेल्याची टीका केली.

ठळक मुद्देसरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोपदेशात सर्वत्र कर सारखा असतांना उसाच्या दरात फरक का?

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.२० : केंद्रात आणि राज्यात नवीन सरकार आले, मात्र सरकार जरी बदलले तरी धोरणे मात्र बदलत नसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी वाचला तरच राज्य आणि देश वाचेल असे परखड मत शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. येथील विश्रामगृहात सोमवारी सकाळी ९.०० वाजता पत्रपरिषद झाली.ते म्हणाले की, सगळीकडे शेतकरी चिंतेत आहे. कर्जमुक्तीत फसवणूक झाली आहे. अस्वस्थता वाढली आहे. अॉनलाईन फंडामुळे घोळ सुरू आहेत, मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे कर्जमुक्ती विज्ञानाला धरून नाही. नोटाबंदीत झाले तेच कर्जमुक्तीत झाले म्हणून भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिती ओढवली आहे. खरीप हंगाम गेला आता रब्बी चालला आहे. राज्यात सर्वत्र अस्वस्थता आहे. यादीत नाव नाही म्हणून शेतकº्यांनी आत्महत्त्या केली. उद्योगपतींनी बॅका बुडविल्या. जेटलींनी २ लाख ११ कोटींची मदत केली.मात्र शेतकरी कर्जमुक्तीला अडथळे केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.सरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत आहे . तूर, उडीद, गहू, हरभरा यांचे बाजारभाव पडले आहेत. ऊसाच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे. आताच्याही सरकारला कारखानदारांनी विकत घेतले आहे. ऊसाच्या प्रति टन भावात २५५० मूलभूत दरात ७०० चा फरक आहे. ऊसाला प्रति टन चार हजाराच्या आसपास गुजरातमध्ये भाव आहे. महाराष्ट्रात शेतकº्याला भाव का मिळत नाही? सर्वत्र कर सारखा आहे मात्र ऊसाचं दरात फरक का? हे समजत नाही. साखर कारखानदारांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. प्रति टन एक ते दीड हजाराचा फटका बसतो आहे. शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही लूट थांबणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार