शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

केंद्रात आणि राज्यात सरकारे बदलली मात्र धोरणे बदलली नाहीत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:32 IST

शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी चोपडा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले गेल्याची टीका केली.

ठळक मुद्देसरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोपदेशात सर्वत्र कर सारखा असतांना उसाच्या दरात फरक का?

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.२० : केंद्रात आणि राज्यात नवीन सरकार आले, मात्र सरकार जरी बदलले तरी धोरणे मात्र बदलत नसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी वाचला तरच राज्य आणि देश वाचेल असे परखड मत शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. येथील विश्रामगृहात सोमवारी सकाळी ९.०० वाजता पत्रपरिषद झाली.ते म्हणाले की, सगळीकडे शेतकरी चिंतेत आहे. कर्जमुक्तीत फसवणूक झाली आहे. अस्वस्थता वाढली आहे. अॉनलाईन फंडामुळे घोळ सुरू आहेत, मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे कर्जमुक्ती विज्ञानाला धरून नाही. नोटाबंदीत झाले तेच कर्जमुक्तीत झाले म्हणून भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिती ओढवली आहे. खरीप हंगाम गेला आता रब्बी चालला आहे. राज्यात सर्वत्र अस्वस्थता आहे. यादीत नाव नाही म्हणून शेतकº्यांनी आत्महत्त्या केली. उद्योगपतींनी बॅका बुडविल्या. जेटलींनी २ लाख ११ कोटींची मदत केली.मात्र शेतकरी कर्जमुक्तीला अडथळे केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.सरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत आहे . तूर, उडीद, गहू, हरभरा यांचे बाजारभाव पडले आहेत. ऊसाच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे. आताच्याही सरकारला कारखानदारांनी विकत घेतले आहे. ऊसाच्या प्रति टन भावात २५५० मूलभूत दरात ७०० चा फरक आहे. ऊसाला प्रति टन चार हजाराच्या आसपास गुजरातमध्ये भाव आहे. महाराष्ट्रात शेतकº्याला भाव का मिळत नाही? सर्वत्र कर सारखा आहे मात्र ऊसाचं दरात फरक का? हे समजत नाही. साखर कारखानदारांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. प्रति टन एक ते दीड हजाराचा फटका बसतो आहे. शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही लूट थांबणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार