शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

केंद्रात आणि राज्यात सरकारे बदलली मात्र धोरणे बदलली नाहीत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:32 IST

शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी चोपडा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले गेल्याची टीका केली.

ठळक मुद्देसरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोपदेशात सर्वत्र कर सारखा असतांना उसाच्या दरात फरक का?

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.२० : केंद्रात आणि राज्यात नवीन सरकार आले, मात्र सरकार जरी बदलले तरी धोरणे मात्र बदलत नसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी वाचला तरच राज्य आणि देश वाचेल असे परखड मत शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. येथील विश्रामगृहात सोमवारी सकाळी ९.०० वाजता पत्रपरिषद झाली.ते म्हणाले की, सगळीकडे शेतकरी चिंतेत आहे. कर्जमुक्तीत फसवणूक झाली आहे. अस्वस्थता वाढली आहे. अॉनलाईन फंडामुळे घोळ सुरू आहेत, मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे कर्जमुक्ती विज्ञानाला धरून नाही. नोटाबंदीत झाले तेच कर्जमुक्तीत झाले म्हणून भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिती ओढवली आहे. खरीप हंगाम गेला आता रब्बी चालला आहे. राज्यात सर्वत्र अस्वस्थता आहे. यादीत नाव नाही म्हणून शेतकº्यांनी आत्महत्त्या केली. उद्योगपतींनी बॅका बुडविल्या. जेटलींनी २ लाख ११ कोटींची मदत केली.मात्र शेतकरी कर्जमुक्तीला अडथळे केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.सरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत आहे . तूर, उडीद, गहू, हरभरा यांचे बाजारभाव पडले आहेत. ऊसाच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे. आताच्याही सरकारला कारखानदारांनी विकत घेतले आहे. ऊसाच्या प्रति टन भावात २५५० मूलभूत दरात ७०० चा फरक आहे. ऊसाला प्रति टन चार हजाराच्या आसपास गुजरातमध्ये भाव आहे. महाराष्ट्रात शेतकº्याला भाव का मिळत नाही? सर्वत्र कर सारखा आहे मात्र ऊसाचं दरात फरक का? हे समजत नाही. साखर कारखानदारांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. प्रति टन एक ते दीड हजाराचा फटका बसतो आहे. शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही लूट थांबणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार