शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
5
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
6
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
7
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
8
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
9
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
10
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
11
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
12
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
13
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
14
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
15
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
16
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
17
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
18
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
19
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
20
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पदोन्नती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तत्कालीन नगरपालिकेने सन १९९२ व १९९७ मध्ये चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांची जम्बो भरती केली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तत्कालीन नगरपालिकेने सन १९९२ व १९९७ मध्ये चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांची जम्बो भरती केली होती. नियुक्तीपत्र दिल्यानंतर तीनच दिवसात बहुतांश कर्मचाऱ्यांना उड्डाण पदोन्नती देत मजुराला अभियंता, कुलीवरून थेट डॉक्टर अशा पदांवर उड्डाण पदोन्नती देण्यात आल्या होत्या. याबाबत २०१९ मध्ये लेखापरीक्षण झाल्यानंतर शासनाकडे दिलेल्या प्रस्तावावर शासनाने आदेश काढत, मनपा अधिकाऱ्यांना दणका दिला असून, दोन दिवसात चतुर्थ श्रेणी पदावरून वर्ग एकच्या पदावर गेलेल्या अधिकाऱ्यांना मुळ पदावर आणण्याचा किंवा त्यांची पदोन्नती रद्द करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत.

हे प्रकरण जरी २५ वर्षांपुर्वीचे असले तरी या प्रकरणी आता लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील लेखा परीक्षण समितीने मनपामध्ये दहा दिवस ठाण मांडून याबाबतची सर्व माहिती घेतल्यानंतर आता आपल्या अहवालात या पदोन्नतीबाबत आक्षेप घेतले होते. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. याबाबत लेखा परीक्षण करून, याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने याबाबतचे आदेश काढले असून, मनपातील अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.

काय आहे प्रकरण

१. तत्कालीन नगरपालिकेत सन १९९१ व १९९७ मध्ये चतुर्थ श्रेणीतील जागा तत्कालीन पालिकेतील रोजंदारी कर्मचारी यांची भरती करण्यात आली. विशेष म्हणजे ही पदे भरताना समायोजन व समाज कल्याण कडून उमेवारांची यादी घेणे, जाहिरात देणे, अनुशेष काढणे व रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना प्राद्यान्य देणे असे नियम पाळणे आवश्यक असताना यावेळी केवळ रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा एकच नियम पाळून भरती करण्यात आली.

२. ही भरती झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानतंर काहींना एक किंवा दोन तर काहींना तीनच दिवसात चतुर्थ श्रेणीवरुन अभियंता, शाखा अभियंता, अधीक्षकांसह तांत्रिक पदांवर थेट उड्डाण पद्दोन्नती देण्यात आल्या. विशेष म्हणजे या भरती व पदोन्नत्यांवर लेखा परिक्षणात आक्षेप देखील आले होते. मात्र, त्यावेळेस याबाबत कोणतीही कारवाई झाली नव्हती.

काय म्हटले आहे आदेशात

१. राज्य शासनाकडून मनपाकडे प्राप्त झालेल्या आदेशात तत्कालीन मुख्यधिकारी व तत्कालीन नगराध्यक्षांवर या प्रकरणी कारवाई करणे कठीण असल्याचे सांगितले आहे.

२. सध्यस्थितीत उड्डाण पदोन्नती घेवून मनपात अधिकारी झालेल्या कर्मचाऱ्यांना मुळ पदावर आणण्यात यावे किंवा त्यांची पदोन्नती रद्द करण्यात यावी किंवा संबधित अधिकाऱ्यांचा वेतनावर शास्ती लावण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.

३. जे कर्मचारी आता सेवानिवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी शासनाकडे त्वरित जमा करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

अनेक कर्मचारी झाले सेवानिवृत्त, तर काही झाले मयत

महापालिकेत उड्डाण पदोन्नती घेणारे सुमारे ६७ ते ६९ कर्मचारी आहेत. त्यांना शिपाई, मजूर व कुली अशा पदांवरुन दोन ते तिन दिवसात थेट शाखा अभियंता, अधीक्षक तसेच तांत्रिक पदांवर बेकायदेशीररित्या बढती देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांमधील बहुतांश जण आता सेवानिवृत्त झाले आहेत. तर अनेक जण मयत झाले आहेत. तर जे सध्या महापालिकेच्या आस्थापनेत आहेत. ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.