शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

शासनाने ग्रंथालय व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:32 IST

राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे विचार निसर्ग कवी, पद्मश्री ना.धों. महानोर यांनी रविवारी येथे मांडले.

ठळक मुद्देपद्मश्री ना.धों.महानोर यांचे प्रतिपादनजामनेरला तावडी बोली साहित्य संमेलनात साहित्यिकांची मांदियाळीसाहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन

जामनेर, जि.जळगाव : राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे विचार निसर्ग कवी, पद्मश्री ना.धों. महानोर यांनी रविवारी येथे मांडले.पहिले राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलन जामनेर येथील एकलव्य माध्यमिक शाळेच्या प्रांगणात झाले. उद्घाटन महानोर यांनी, तर मान्यवरांनी दीपप्रज्वालन केले.महानोर यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरींचे पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव शासन देते याचा अर्थ असा की, शासन जनसामान्यांच्या मागणीचा आदर करते.माझे जगणे शेतीसाठीच आहे, मी आधी शेतकरी, नंतरच कवी. माझे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील असले तरी माझे ऋणानुबंध जामनेर तालुक्यातीलच घट्ट आहेत. शेंदुर्णीत शिक्षण घेतले या गावाने मला संस्कार दिले.खान्देशचे मोठेपण सांगताना महानोर म्हणाले, काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणविस ४५ वर्षे जळगाव जिल्ह्यात वास्तव्य करून होते, केशवसुत, बालकवी, साने गुरूजी, बा.सी.मर्ढेकर, विं.दा. करंदीकर इथेच रमले. शेंदुर्णीला दु.आ.तिवारींचा समृद्ध साहित्याचा साठा मी जपून ठेवला आहे. पु.ल.देशपांडे, सुधीर फडके, ग.दी.माळगुळकर ही साहित्यातील मोठी माणसे आहेत.अ.भा. साहित्य संमेलन व विश्व मराठी साहित्य संमेलनास मी जाणार नाही, असे यावर्षी जाहीर केले. तरी मी जामनेरला का आलो, याबाबत बोलताना महानोर यांनी सांगितले की, मी खेड्यातील छोटा कवी म्हणून पुढे आलो. ग्रामीण भागातील बोली भाषेवर संमेलन करणाºयांना बळ मिळावे यासाठी मी आलो.महानोर यांनी शरद पवार यांनी जळगाव येथून काढलेल्या शेतकरी दिंडीची आठवण यावेळी सांगितली. जामनेर मुक्कामी दिंडी आली असताना आपण हातात तंबोरा घेऊन शेतकºयांसमोर त्यांच्या वेदना मांडणाºया कविता सादर केल्या. शेतकºयांनासुद्धा वाटले की कुणीतरी आपल्या व्यथा जाणणारा आहे. इतर राजकीय नेत्यांपेक्षा अल्प दिंडीतील शेतकरी शोधत होते.प्रत्येकाच्या घरातील देवघरात देव आहेत, पण तुम्ही तुमच्या घरात देवरुपी ग्रंथ ठेवा, असा आग्रह करीत ते म्हणाले, आजची पिढी पुस्तकापासून दुर चालली आहे. वाचनसंस्कृती कमी होत आहे. बोलीभाषा समृद्ध करा, तुम्ही पीएचडी करा अथवा संशोधन करा पण बोली भाषेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील, प्रा.डॉ.किसन पाटील, अशोक कोतवाल, प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे, शशीकांत हिंगोणेकर, मधु पांढरे, डी.डी.पाटील, जे.के.चव्हाण, अ‍ॅड.शिवाजी सोनार, सुशीला पगारिया होत्या. जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील, सचिव डॉ.अशोक कोळी व त्यांच्या सहकाºयांनी पाहुण्यांचे स्वागत केले.स्वागताअध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून दिलेल्या शुभेच्छा प्रसारित करण्यात आल्या. महाजन यांनी सांगितले की, तावडी बोलीच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू.गणेश राऊत व डॉ.स्वाती विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. एल.जी.महाजन यांच्या चित्र प्रदर्शनाचे महानोर व मान्यवरांनी उद्घाटन केले.

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर