शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

वॉटर मीटरसाठीच्या मदतीस शासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनपा प्रशासनाने वॉटर मीटरची तरतूद न केल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनपा प्रशासनाने वॉटर मीटरची तरतूद न केल्याने मनपासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनाने या प्रकरणी हात वर केले असून, अमृत अंतर्गत ज्या शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्याठिकाणी स्थानिक प्रशासनानेच वॉटर मीटरची तरतूद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे मनपाला वॉटर मीटर हे आपल्या फंडातूनच खरेदी करावे लागणार आहेत. आधीच आर्थिक परिस्थितीत अडकलेल्या महापालिकेसमोर आता वॉटर मीटरसाठी ९६ कोटींची तरतूद करण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा दिला जाणार असल्याचा दावा मनपाकडून केला जात होता. मात्र, योजनेच्या निविदेत जर वॉटर मीटरची तरतूदच नसेल तर जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. याबाबत जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मनपाने निविदेत वॉटर मीटरची तरतूदच केली नसल्याने जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा देण्याचा दावा फोल असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मनपाकडून केवळ दिशाभूल केली जात असल्याचे सांगत मनपा प्रकल्प अभियंत्यांच्या चुकीमुळे मनपाने निविदेत वॉटर मीटरची तरतूदच केली नसल्याचे निष्पण्ण झाले होते. दरम्यान, जळगाव फर्स्टने हे प्रकरण लक्षात आणून दिल्यानंतर मनपाकडून वॉटर मीटर बसविण्यासाठी ९६ कोटींचा खर्च येणार असल्याचे प्राथमिक अंदाजपत्रक काढण्यात आले आहे. तसेच यासाठी मनपा आयुक्तांनी राज्य शासनाकडून ही रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, राज्य शासनाने ही रक्कम देण्यास नकार दिला असून, या योजनेत वॉटर मीटर बसविण्यासाठी शासनाने कोणतीही तरतूद केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नागरिकांकडून घरपट्टीच्या स्वरूपात वसूल होऊ शकते रक्कम

राज्य शासनाने नकार दिल्यामुळे आता ही रक्कम निर्माण करण्यासाठी मनपाने तयारी सुरू केली आहे. अमृत योजनेतील काँक्रीटचे काम रद्द झाल्यामुळे तरतूद करण्यात आलेल्या ९२ कोटींपैकी सुमारे ४० कोटींची रक्कम मनपाकडे शिल्लक राहणार आहे. त्यामुळे शहरातील सुमारे ७५ हजार ग्राहकांकडून वसूल करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. मीटरचा हिस्सा नागरिकांकडून पाच वर्षात घरपट्टीच्या रकमेतून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी मनपाच्या महासभेपुढे मनपाकडून आयत्यावेळच्या विषयात हा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे.