शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वॉटर मीटरसाठीच्या मदतीस शासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनपा प्रशासनाने वॉटर मीटरची तरतूद न केल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनपा प्रशासनाने वॉटर मीटरची तरतूद न केल्याने मनपासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनाने या प्रकरणी हात वर केले असून, अमृत अंतर्गत ज्या शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्याठिकाणी स्थानिक प्रशासनानेच वॉटर मीटरची तरतूद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे मनपाला वॉटर मीटर हे आपल्या फंडातूनच खरेदी करावे लागणार आहेत. आधीच आर्थिक परिस्थितीत अडकलेल्या महापालिकेसमोर आता वॉटर मीटरसाठी ९६ कोटींची तरतूद करण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा दिला जाणार असल्याचा दावा मनपाकडून केला जात होता. मात्र, योजनेच्या निविदेत जर वॉटर मीटरची तरतूदच नसेल तर जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. याबाबत जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मनपाने निविदेत वॉटर मीटरची तरतूदच केली नसल्याने जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा देण्याचा दावा फोल असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मनपाकडून केवळ दिशाभूल केली जात असल्याचे सांगत मनपा प्रकल्प अभियंत्यांच्या चुकीमुळे मनपाने निविदेत वॉटर मीटरची तरतूदच केली नसल्याचे निष्पण्ण झाले होते. दरम्यान, जळगाव फर्स्टने हे प्रकरण लक्षात आणून दिल्यानंतर मनपाकडून वॉटर मीटर बसविण्यासाठी ९६ कोटींचा खर्च येणार असल्याचे प्राथमिक अंदाजपत्रक काढण्यात आले आहे. तसेच यासाठी मनपा आयुक्तांनी राज्य शासनाकडून ही रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, राज्य शासनाने ही रक्कम देण्यास नकार दिला असून, या योजनेत वॉटर मीटर बसविण्यासाठी शासनाने कोणतीही तरतूद केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नागरिकांकडून घरपट्टीच्या स्वरूपात वसूल होऊ शकते रक्कम

राज्य शासनाने नकार दिल्यामुळे आता ही रक्कम निर्माण करण्यासाठी मनपाने तयारी सुरू केली आहे. अमृत योजनेतील काँक्रीटचे काम रद्द झाल्यामुळे तरतूद करण्यात आलेल्या ९२ कोटींपैकी सुमारे ४० कोटींची रक्कम मनपाकडे शिल्लक राहणार आहे. त्यामुळे शहरातील सुमारे ७५ हजार ग्राहकांकडून वसूल करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. मीटरचा हिस्सा नागरिकांकडून पाच वर्षात घरपट्टीच्या रकमेतून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी मनपाच्या महासभेपुढे मनपाकडून आयत्यावेळच्या विषयात हा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे.