शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

महिलांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील - अजित पवार

By admin | Updated: July 13, 2017 14:04 IST

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 13 - कोपर्डी येथील घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप नगराधमांना शिक्षा झालेली नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. शारीरिक शोषण, बलात्काराच्या घटना सरकारला धक्कादायक वाटत नाही, इतके सरकार स्त्रियांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून मूक मोर्चास सकाळी 11.15 वाजता प्रारंभ झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारणेचपक्ष कार्यालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत अत्यंत शांत व शिस्तबद्धरित्या मूक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर अजित पवार यांनी जिल्हाधिका:यांकडे शासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोपर्डीच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला सुरु असूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारणेच. महिला अत्याचाराची परिसिमा गाठलीकेवळ कोपर्डीच नव्हे तर त्यानंतर महिलांवरील अत्याचाराची साखळीच सुरु आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांवरील अत्याचाराची परिसिमा गाठली आहे. अपहरण करुन बलात्काराच्या तीन घटना मुंबईत एकाच आठवडय़ात घडल्या. धावत्या वाहनातही महिला सुरक्षित राहिलेल्या नसल्याचीही टीका पवार यांनी केली.रामराज्य फक्त कागदावरचउच्च न्यायालयानेही महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारला फटकारले आहे. रामराज्य फक्त कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात महिला सुरक्षेबाबत सरकार उदासीन आहे. केवळ उपाययोजना नको, ठोस पावले उचलावीत, असे न्यायालयानेही सरकारला सुनावले असल्याचेही पवार म्हणाले.