शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील - अजित पवार

By admin | Updated: July 13, 2017 14:04 IST

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 13 - कोपर्डी येथील घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप नगराधमांना शिक्षा झालेली नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. शारीरिक शोषण, बलात्काराच्या घटना सरकारला धक्कादायक वाटत नाही, इतके सरकार स्त्रियांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून मूक मोर्चास सकाळी 11.15 वाजता प्रारंभ झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारणेचपक्ष कार्यालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत अत्यंत शांत व शिस्तबद्धरित्या मूक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर अजित पवार यांनी जिल्हाधिका:यांकडे शासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोपर्डीच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला सुरु असूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारणेच. महिला अत्याचाराची परिसिमा गाठलीकेवळ कोपर्डीच नव्हे तर त्यानंतर महिलांवरील अत्याचाराची साखळीच सुरु आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांवरील अत्याचाराची परिसिमा गाठली आहे. अपहरण करुन बलात्काराच्या तीन घटना मुंबईत एकाच आठवडय़ात घडल्या. धावत्या वाहनातही महिला सुरक्षित राहिलेल्या नसल्याचीही टीका पवार यांनी केली.रामराज्य फक्त कागदावरचउच्च न्यायालयानेही महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारला फटकारले आहे. रामराज्य फक्त कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात महिला सुरक्षेबाबत सरकार उदासीन आहे. केवळ उपाययोजना नको, ठोस पावले उचलावीत, असे न्यायालयानेही सरकारला सुनावले असल्याचेही पवार म्हणाले.