शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

धान्याचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:03 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : रावेर व यावल तालुक्यातील धान्य घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासणी झाली, अहवाल आला तरीदेखील मात्र एका गोदामातील धान्याबाबत कोणीच जबाबदारी घेत नसल्याने या धान्याचे काय गौडबंगाल आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.यावल- रावेर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानावरील धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने अचानकपणे छापा टाकून गोदामातील धान्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ बाळू नेवे, विलास चौधरी व योगेश पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावल आणि रावेर तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून तपासणी करण्यात आली. यात यावल तालुक्यातील १०० तर रावेर तालुक्यातील ५१ रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी यावल तालुक्यातील २४ तर रावेर तालुक्यातील १० असे एकूण ३४ रेशन दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले होते.या प्रकरणी ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये रावेर येथील बºहाणपूर रस्त्यांवरील (गोदाम क्रमांक २) व जीआयसी कॉलनीमधील (गोदाम क्रमांक ३) मधील साठ्याच्या पावत्या व इतर कागदपत्रे संबंधितांनी सादर केले. या मध्ये गोदाम क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसऱ्या गोदाममध्ये मका साठवलेला होता. मात्र गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आलेल्या पहिल्या गोदाममध्ये असलेल्या साठ्याची जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे या तीनही गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावल तालुक्यातील ८ तर रावेर तालुक्यातील ६ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले व त्यानुसार या १४ दुकानांचे परवाने तडकाफडकी रद्द केले होते. तसेच त्यापूर्वीच दोन दुकानांचे परवाने रद्द झाल्याने ही संख्या आता १६वर पोहचली.कारवाई होताना दिसत असली तरी एका गोदामातील धान्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याने या गौडबंगालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

धान्याचे गौडबंगालविश्लेषणविजयकुमार सैतवालजळगाव : रावेर व यावल तालुक्यातील धान्य घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासणी झाली, अहवाल आला तरीदेखील मात्र एका गोदामातील धान्याबाबत कोणीच जबाबदारी घेत नसल्याने या धान्याचे काय गौडबंगाल आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.यावल- रावेर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानावरील धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने अचानकपणे छापा टाकून गोदामातील धान्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ बाळू नेवे, विलास चौधरी व योगेश पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावल आणि रावेर तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून तपासणी करण्यात आली. यात यावल तालुक्यातील १०० तर रावेर तालुक्यातील ५१ रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी यावल तालुक्यातील २४ तर रावेर तालुक्यातील १० असे एकूण ३४ रेशन दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले होते.या प्रकरणी ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये रावेर येथील बºहाणपूर रस्त्यांवरील (गोदाम क्रमांक २) व जीआयसी कॉलनीमधील (गोदाम क्रमांक ३) मधील साठ्याच्या पावत्या व इतर कागदपत्रे संबंधितांनी सादर केले. या मध्ये गोदाम क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसऱ्या गोदाममध्ये मका साठवलेला होता. मात्र गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आलेल्या पहिल्या गोदाममध्ये असलेल्या साठ्याची जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे या तीनही गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावल तालुक्यातील ८ तर रावेर तालुक्यातील ६ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले व त्यानुसार या १४ दुकानांचे परवाने तडकाफडकी रद्द केले होते. तसेच त्यापूर्वीच दोन दुकानांचे परवाने रद्द झाल्याने ही संख्या आता १६वर पोहचली.कारवाई होताना दिसत असली तरी एका गोदामातील धान्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याने या गौडबंगालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव