शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावच्या वृषाली-साक्षी यांचे सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST

जळगाव : जळगावच्या वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविस्कर यांनी जबरदस्त खेळ करताना औरंगाबादच्या करिष्मा कालिके आणि आदिती जगताप यांचा ...

जळगाव : जळगावच्या वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविस्कर यांनी जबरदस्त खेळ करताना औरंगाबादच्या करिष्मा कालिके आणि आदिती जगताप यांचा पाडाव करत, जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुसरीकडे प्रशांत राऊळ आणि श्रीजीत नायर यांनी पुरुष दुहेरीत कांस्य पदक जिंकले.

जल मंगल दीप युथ क्लब (जेएमडीवायसी) आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेला अखिल भारतीय पिकलबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांची मान्यता होती. महिला दुहेरीचा अंतिम सामना अत्यंत एकतर्फी रंगला. वृषाली-साक्षी या जोडीने सावध सुरुवातीनंतर आक्रमक पवित्रा घेत, करिष्मा-आदिती यांना एकही संधी दिली नाही. वृषाली-साक्षी यांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना ११-७, ११-५ अशा विजयासह जेतेपद पटकावले.

स्पर्धेत मिश्र दुहेरी गटामध्ये जळगावने शानदार कामगिरी केली. जळगावच्याच खेळाडूंमध्ये झालेल्या कांस्य पदकाच्या लढतीत चमकदार खेळ झाला. यामध्ये अजय चौधरी-वृषाली ठाकरे यांनी कांस्य पदक पटकावताना भूपेंद्र पोळ-साक्षी बाविसकर यांचा ११-८, ११-९ असा पराभव केला.